शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

ठाण्यात कामगाराची आत्महत्या: मृत्यु दाखल्यासाठी पोलिसांना करावी लागली नऊ तासांची भटकंती

By जितेंद्र कालेकर | Published: April 22, 2020 11:49 PM

केवळ काही ठराविक नियमांवर बोट ठेवत एखाद्या सामान्य नागरिकाला तिष्ठत ठेवणे हे सरकारी कार्यालयांमधून अनेकदा पहायला मिळते. असाच अनुभव आत्महत्या केलेल्या कामगाराच्या पत्नीला आणि कापूरबावडी पोलिसांना नुकताच आला. या कामगाराच्या मृत्युच्या दाखल्यासाठी आणि शवविच्छेदनासाठी तब्बल नऊ तासांची भटकंती करावी लागण्याची वेळ पोलिसांवर आली. संवेदनाहहिन यंत्रणेचा हा फटका गेल्या तीन दिवसांमध्ये दोन कुटूंबियांना बसल्यामुळे सखेद संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे दोन दिवसांमधील तिसरी घटना संवेदनाहिन यंत्रणेचा नातेवाईक आणि पोलिसांनाही फटका

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घरातील कौटूंबिक कलहातून राजू विजय रेड्डी (४५, रा. गजानन रहिवासी चाळ, मानपाडा, ठाणे) याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. पंचनाम्यानंतर त्याच्या मृत्युच्या दाखल्यासाठी कापूरबावडी पोलिसांना चक्क नऊ तासांची भटकंती करावी लागली. अखेर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.राजू रेड्डी याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर २१ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याने मानपाडा येथील घरातील छताच्या हुकाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेतल्याचे आढळले. त्याचा मृतदेह थेट ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोलिसांनी ८.३० वाजता नेला. मात्र, हे कोरोनासाठीच्या रुग्णांसाठी असल्यामुळे याठिकाणी शवविच्छेदन होणार नाही आणि त्यामुळे मृत्युच्या कारणाचा दाखलाही देता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रुग्णवाहिकाही रुग्णालयाच्या बाहेरच थोपविण्यात आली. तिथून नातेवाईक आणि मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन पोलीस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेले. तिथे मृतदेह आत घेण्यात आला. पण मृतदेहाच्या शवविच्छेदनास त्यांनी नकार दिला. तसेच पालिका आयुक्तांचे आदेश असून हद्दीचे कारण दाखवत तेथील डॉक्टरांनी शवविच्छेदनाला नकार दिला. ज्याचा मृत्यु झाला त्याची ४० वर्षीय पत्नी आणि तीन मुले आहेत. मोलमजूरी करणारे हे कुटूंब असून त्यांना कोणाचाही आधार नाही. रुग्णवाहिकेचा खर्चही पोलिसांनी पदरमोड करुन केला, असेही या पोलिसांनी तेथील डॉक्टरांना सांगितले. पण तरीही या शवविच्छेदनाला तेथील डॉक्टरांनी नकार दिला. हे सर्व करण्यासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाºयाला जिल्हा रुग्णालय ते कळवा रुग्णालय असे तीन ते चार वेळा हेलपाटे मारावे लागले. या सर्व लालफितीमध्ये मरणानंतरही राजू रेड्डी या कामगाराचा मृतदेह रुग्णवाहिकेतच ताटकळला होता. अखेर एका नगरसेवकाच्या निदर्शनास ही बाब पोलिसांनी आणून दिली. या नगरसेवकाने सूत्रे हलविल्यानंतर शेवटी जिल्हा रुग्णालयाने शवविच्छेदनाला मान्यता दिली. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस बरोबर असूनही एका सामान्य महिलेला आपल्या पतीच्या मृत्युच्या दाखल्यासाठी कोरोनामुळे भटकंती करावी लागली. एकीकडे कोरोनाला घाबरु नका पण खबरदारी घ्या असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी मृत्युनंतरही सामान्य नागरिकांना असे हाल सोसावे लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सलग दुसºया दिवशी असाच अनुभव पोलिसांना आला आहे. सोमवारीही आकाश जाधव याच्या आत्महत्येनंतर चितळसर पोलिसांनाही मृत्युच्या दाखल्यासाठी अशीच सुमारे सहा तासांची भटकंती करावी लागली. 

‘‘ यापूर्वीही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या वागळे इस्टेट येथील मुलीला उपचारासाठी नाकारण्यात आले होते. आता चितळसर आणि मानपाडयातील या दोन घटनांमध्येही पुन्हा हे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी केली जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांनाही पत्रव्यवहार केला जाईल.’’अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी