शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:50 AM

‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने नेल्सन मंडेला यांना सन्मानित केले;

डोंबिवली :‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने नेल्सन मंडेला यांना सन्मानित केले; मात्र देशासाठी, मातृभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना मात्र सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारने सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा. डोंबिवलीकरांसह असंख्य सावरकरप्रेमींची ती इच्छा आहे, असे मत पुण्याचे प्रख्यात व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री चव्हाण यांनी येथील सावरकर उद्यानामध्ये मंगळवारी व्याख्यान आणि सावरकर जीवनपट या विषयावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यावेळी बावस्कर बोलत होते. युवकांनी जास्तीतजास्त सावरकर साहित्याचे वाचन करावे. मातृभूमी प्रेम, भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सावरकरांचे तसेच त्यांचे वडील बंधू, धाकटे बंधू आणि पूर्ण कुटुंबीयांनी दिलेली आहुती यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना सांगितले. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे आणि पुढील पिढीला गुलामगिरीमुक्त करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा, असंख्य वेदना सहन केल्याचे ते म्हणाले.अंदमान येथील स्वा. सावरकरांच्या ओळी काढून टाकण्यात आल्या आहेत. तेव्हापासून चव्हाण यांनी सावरकर उद्यानात त्या ओळी पुन्हा लागत नाहीत, तोपर्यंत अखंड ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. आता पुन्हा मोदी सरकार आले आहे, ही ज्योत अखंड तेवत ठेवावी लागणार नाही, याची जबाबदारी चव्हाण हे घेतील आणि त्यासाठी येथील नागरिकांनीही पाठपुरावा करावा, असे आवाहन बावस्कर यांनी केले. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.यानिमित्ताने भरवण्यात आलेल्या सावरकर जीवनपट चित्रप्रदर्शनाला असंख्य डोंबिवलीकरांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यावेळी भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, सुरेश पुराणिक, संजीव बीडवाडकर, प्रभू कापसे आदींसह असंख्य सावरकरप्रेमी आवर्जून उपस्थितहोते.