शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि एसटीपी प्लांट, अशा दोन्ही सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शहरांना हगणदरी २ प्लसचे प्रमाणमिळते. महापालिकेच्या हद्दीत या दोन्ही सुविधा असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हे प्रमाणपत्र देण्यात आले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेस ११४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ काही टक्के रक्कम सरकारकडून मिळणार होती. तर, उर्वरित रक्कम महापालिकेने उभारणे अपेक्षित होते. महापालिकेने या अभियानांतर्गत कचरा उचलणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. तसेच ६० कोटी रुपये उंबर्डे व बारावे घनकचरा प्रकल्प उभारणे, शास्त्रोक्त पद्धतीने आधारवाडी डम्पिंग बंद करणे, यावर खर्च करण्यात येणार आहेत.स्वच्छ भारत अभियान महापालिका हद्दीत २०१४ पासून सुरू आहे. गेल्या चार वर्षांत महापालिकेस केवळ हगणदरीमुक्तीचे प्लस वनचे प्रमाणपत्र मिळाले होते. एका वर्षात महापालिकेस कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. दरवर्षी केंद्र सरकारचे पथक पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेते. महापालिकेने झोपडपट्टी परिसरातील ८३ सार्वजनिक शौचालये व रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणची २० सार्वजनिक शौचालये सुस्थितीत असल्याचा अहवाल तयार केला होता. त्यापैकी २६ सार्वजनिक शौचालयेही ही उत्कृष्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, पथकाच्या पाहणीनंतर २६ सार्वजनिक शौचालयांपैकी २१ अस्वच्छ आढळली नाहीत. तसेच वाईट स्थितीतही नव्हती.एक सार्वजनिक शौचालय अत्यंत चांगले आढळून आले. तर पाच सार्वजनिक शौचालये अत्यंत स्वच्छ दिसून आली. उर्वरित १७ शौचालयेही चांगल्या स्थितीत आढळून आली. त्याचबरोबर आधारवाडी, बारावे, टिटवाळा आणि टिटवाळा पश्चिमेतील मलशुद्धीकरण केंद्रांची पथकाने पाहणी करून तेथे योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात आहे का, याची पाहणी केली. त्याचबरोबर प्रक्रियेनंतर खाडी व नदीत सोडण्यात येणाºया पाण्यात बीओटी व सीओडीचे प्रमाण किती आहे, याचीही तपासणी केली. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे का, याचीही पाहणी केली.अशी केली पाहणीमहापालिका हद्दीत साडेचार लाख मालमत्ता आहेत. त्यात वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली गेली.सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात आहे की नाही. त्याचबरोबर कोणी उघड्यावर शौचास बसत नाही ना याचीही पाहणी पथकाने केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान