शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला धक्का! एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
4
यमुना एक्सप्रेस वेववरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
5
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
6
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
7
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
8
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
9
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
10
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
11
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
12
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
14
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
15
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
17
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
18
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
19
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
20
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विश्व बंधुत्वाचा मार्ग प्रशस्त - मकरंद मुळे

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 11, 2023 4:45 PM

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते.

ठाणे : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे धर्मसभेत केलेल्या भाषणाने समृद्ध हिंदू विचारांचे दर्शन जगाला घडले होते. जगण्याचा आधार ठरणाऱ्या भारतीय तत्वज्ञानाचे महत्व जागतिक स्तरावर मान्य झाले होते. बंधुभावाच्या, निरपेक्ष स्नेहाच्या आधारे मानवी जीवन विकसित होऊ शकते याचा जागतिक समुदायात विश्वास जागला होता असे प्रतिपादन राजकीय-सामाजिक विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले. 

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ठाणे नौपाडा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विवेकानंद केंद्र कोकण प्रांत प्रमुख दीपक नामजोशी होते. 

शिकागो येथील जागतिक धर्मसभेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक भाषण झाले होते. भाषणाच्या सुरवातीचे दोन शब्दांनी स्वामी विवेकानंद यांनी जगाचा मानवी नाते संबंधांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल घडवला होता. त्या सर्वस्वी वेगळ्या भाषणाचे स्मरण म्हणून दरवर्षी ११ सप्टेंबर विश्व बंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त मकरंद मुळे बोलत होते. ते म्हणाले, सद्य स्थितीत स्वामी विवेकानंद यांचे विचार जगाला तारू शकतील. स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश आधार ठरेल.

नुकतीच आपल्या देशात यशस्वी झालेली जी-वीस परिषद हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. १८९३ ची शिकागो सर्वधर्म सभा ते २०२३ भारतातील जी-ट्वेन्टी परिषद हा प्रवास हे हिंदू विचार सामर्थ्याचे विशाल दर्शन आहे. स्वामी विवेकानंद यांनी विदेशात उच्चारलेले बंधू-भगिनी हे दोन शब्द आणि जी-वीस जागतिक परिषदेसाठी वापरलेले वसुधैव कुटुंबकम् हे दोन शब्द भारतीय तत्वज्ञान आहे. असे आपल्या भाषणाच्या शेवटी मुळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे