शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

सुरणाच्या शेतीने फुलले टकीपठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:45 AM

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त ...

भातसानगर : ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे टाकीपठार येथील मठाधिपती बाबा फुलनाथ महाराज यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीव्यतिरिक्त कंदमुळे शेतीकडे वळल्यास जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा केवळ संदेश न देता कृती करून दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहित होऊन तालुक्यात कंदमुळांची शेती करू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा हा पहिलाच; पण फलदायी उपक्रम ठरल्याने आता पुढील वर्षी याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बाबांनी स्वतः दोन एकर जागेत एक हजार ५०० क्विंटल सुरण या बियाण्याची लागवड केली. अनेक वर्षांपासून ही लागवड करीत असताना आपल्या शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता सुरणाची शेती केल्यास ती फलदायी ठरेल, असे बाबांच्या मनात आले आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त केले, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन ही सुरण या कंदमुळे शेतीच्या लागवडीखाली आली आहे.

कंदमुळे ही माळरानावर भुसभुशीत जागी कुठेही येतात. केवळ मातीची भर दिली की झाले. कोणतीही मेहनत नाही. खतांची गरज नाही की, कोणत्या रोगाची भीती नाही. मुबलक पाऊस. मग केवळ उत्पादन, अशी अनेक कंदमुळे आहेत, जी जीवनावश्यक आहेत आणि आयुर्वेदिकही आहेत. जी आपणास आवश्यक आहेत. रताळी व सुरण यासारखी पिके घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच समृद्ध करण्यास मदत हाेईल, असा सल्ला बाबांनी दिला. ही सर्वच कंदमुळे दाटीवाटीने लावली तरी चालतात. त्यापैकी सुरण हे पाव किलो, अर्धा किलोच्या वजनाचे एक फळ याप्रमाणे बियाणे असते. ते तीस ते चाळीस रुपयांना पडते. त्यापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. एकदा बियाणे उपलब्ध झाले की, मग त्याच सुरणाच्या रोपापासून अनेक कोंब येऊन अनेक रोपे तयार होतात. हेच फळ साठ ते सत्तर रुपयांना विकले जाते, अशी अनेक रोपे तयार झाल्याने ते अधिक फायदेशीर ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना तालुक्यात बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील मनोहर वेखंडे, काळूराम दिनकर, दशरथ साबळे, वसंत कुडव, जानू विशे यांच्यासह अनेकांनी ही शेती केली आहे.

काेट

बाबांच्या सल्ल्यानुसार सुरणाची शेती माळरानावर केली आहे. मे महिन्यात ती केल्याने आता सहा ते सात किलो वजनाचे सुरण तयार झाले आहेत. रोपेही तयार झाल्याने ही शेती अधिक फलदायी ठरणार आहे.

-बाळाराम निचिते, शेतकरी

..................................

तालुक्यातील शेतकरी कंदमुळांच्या शेतीकडे वळत असल्याने ती शेती नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या शेकडो एकर माळरानावर ती केली जात आहे. ही चांगली बाब आहे.

-अमोल आगवणे, शहापूर तालुका कृषी अधिकारी