शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:12 IST

कवयित्री मनिषा गोडबोले यांच्या कविता संग्रहाचा पुस्तक सोहळा पार पडला.

ठळक मुद्देपुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडितशब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक : अनिल थत्ते

ठाणे: आजची पिढी ही स्मार्ट फोनवर असते. या स्मार्टफोनने आपल्या मेंदूवर कब्जा केला आहे. पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे, ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमीत करण्याचे काम हे आताच्या पिढीने करणे गरजेचे असल्याचे मत लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी व्यक्त केले.  शारदा प्रकाशनतर्फे कवयित्री मनिषा गोडबोले लिखित शब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आई हॉलमध्ये संपन्न झाला.

          यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पंडीत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रंथपाल या नोकरीचा मला हेवा वाटतो कारण ते पुस्तकांच्या राज्यात राहत असतात आणि हीच खरी श्रीमंती आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जेव्हा आपण वाचनालयात किंवा पुस्तक खरेदीसाठी जातो तेव्हा काव्यंसंग्रह फार खरेदी केले जात नाही. ललित, कथा, कादंबरीच जास्त विकत घेतले जातात. परंतू कविता हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. लहानपणी बडबड गीत, शालेय जीवनात कविता, चित्रपटातील गाणी, सांस्कृतिक कार्यक्रमांत, गाणी कविता असा कुठे ना कुठे कवितेशी आपला संबंध येतोच असे सांगत मनिषा गोडबोले यांनी या काव्यसंग्रहात वेगवेगळया विषयांना हात घातला असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी आपणच आपल्याला मोठे करायचे असते असे सांगितले. ते म्हणाले, सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक असतात. आपली कविता आपल्याला आवडायला हवी. बरेच जण प्रस्तावना समिक्षा करतात पण त्यात कौतुक करायचे असते असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी छायाचित्रकार राजेश पिसाट, मोरेश्वर गोडबोले उपस्थित होते. शारदा प्रकाशनचे प्रा. संतोष राणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ते म्हणाले, माणसांना जपणारी माणसेच असतात तशा जपणाऱ्या कविता गोडबोले यांनी लिहील्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक