शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 7:46 PM

Tauktae Cyclone : आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे अचानक कोसळलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मीरा भाईंदर शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी शासकीय मदतीपेक्षा नुकसान मोठे आहे. मीरा भाईंदर महापालिका हद्दीत उत्तन, डोंगरी, तरोडी, पाली, चौक भागात शेतकऱ्यांनी बागायती, कांदा आणि भाजीपाला लागवड केली होती. तर  घोडबंदर, चेणे आदी भागात सुद्धा आंब्याच्या बागा आहेत. चक्रीवादळाने बागायती आणि शेती पार उद्ध्वस्त करून टाकली आहे. या भागातील आंब्याला मागणी असली तरी आलेले पीक सुद्धा वादळाने हातचे गेले आहे. 

आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तरोडी भागातील पांढऱ्या कांद्याचे हातचे आलेले पीक तुडुंब पाणी साचल्याने कुजून गेले. भाजीपाल्यासाठी टाकलेले मांडव मोडून पडले. भाज्यांची केलेली लागवड नष्ट झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी करायला घेतले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येकी किमान २५ हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे वेन्सी मुनीस यांनी केली आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोडRainपाऊस