शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

मराठी शाळा वाचवण्यासाठी गुरुजी रस्त्यावर!.

By सुरेश लोखंडे | Updated: March 17, 2025 14:40 IST

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन २०२५ ची संच मान्यता मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे.

ठाणे : शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करून  ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्याचा हक्क नाकारणारा १५ मार्च २०२४ चा संच मान्यता निर्णय रद्द करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भर उन्हात धरणे सत्याग्रह आंदोलने छेडले. यावेळी शिक्षकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. या शिक्षक आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने येथील निवासी उपजिल्हाधिकारी डाँ. संदीप माने,यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन २०२५ ची संच मान्यता मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होणार आहे, असा आरोप करून हा शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विसंगत आहे , या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शाळेमध्ये शिक्षकच असणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन राज्यांमध्ये जवळपास २० हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. तर ठाणे जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे शिक्षक कमी होणार असल्याचे आंदोलनकार्यांचे म्हणणे आहे.

तीन-तीन वर्गांना एकच शिक्षक प्रत्येक वर्गाचे नऊ विषय शिकवणार असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे. शाळेत शिक्षक नसल्याने पालकांना गावापासून दूरवरच्या शाळेत मुलांना नाईलाजास्तव पाठवावे लागेल. गावात शिक्षण उपलब्ध न झाल्याने गळतीचे प्रमाण तर वाढेलच शिवाय विद्यार्थिनींचा सुरक्षेचा  प्रश्न निर्माण होऊ शकतो.ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याचे भीती आहे. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  वीस पटाच्या आतील इयत्ता सहावी ते आठवीच्या पर्यंतच्या शाळांना शून्य शिक्षक मंजूर नियमात बदल करून एक शिक्षक मंजूर करून अंशतः बदल केला असला तरी आंदोलनावर ठाम राहत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने ठाणे जिल्ह्यासह आज राज्यभर आंदोलन केले.

मागण्या

१) १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करा.२) ठाणे जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस खात्यातील रक्कम एनपीएस खात्यावर वर्ग करा.३) प्रलंबित शिक्षक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबवा.

१५ मार्च २०२४ ची संच मान्यता काय आहे?

१) इयत्ता  १ ली ते ५ वी पर्यंत पाच वर्गांना वीस पटापर्यंत एकच शिक्षक.२) इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत तीन वर्गांना वीस पटापर्यंत सर्व विषयांसाठी एकच शिक्षक.३) पूर्वी ६० पटाच्या वर तिसरा शिक्षक मंजूर व्हायचा तो आता ७६  च्या वर मंजूर होणार.

१५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन निर्णय मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांचा शिक्षणाचा हक्क व मराठी शाळा वाचवण्यासाठी शासनाने हा निर्णय रद्द करावा यासाठी वर्षभर आमच्या प्रत्यक्ष भेटी, अर्ज, विनंत्या चालू आहेत. मराठी भाषेतून गुणवत्तापूर्व शिक्षणातील हा अडथळा दूर होईपर्यंत पालक, शिक्षक, शिक्षण प्रेमी यांना एकत्रित करून  लढा आणखी तीव्र केला जाईल.

विनोद लुटे, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती ठाणे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा