शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 5:40 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे.

मीरारोड - कोरोना संसर्ग आटोक्यात आण्यासाठी कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात ५७ पथके तैनात करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचा नवा पॅटर्न शहरात आणला. परंतु या बहुतांश पथकांना कामचुकारपणा आणि गैरप्रकाराची लागण झाल्याने नियमांचे पालन होताना दिसत नाही. एका पथकास कारवाई करण्यास सांगून देखील त्यांनी उल्लंघन करणाऱ्यास सावध केल्याने शेवटी स्वतः उपायुक्त अजित मुठे यांनीच जाऊन कारवाई करत २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. 

मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे. संसर्ग झाल्यावर वैद्यकीय उपचार यंत्रणा आणि होणारा मोठा खर्च  पाहता त्या ऐवजी कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी जास्तीजास्त खबरदारी घेण्यासाठी घेता यावी  म्हणून मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी तब्बल ५७ गस्ती पथके शहरात नेमली. प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षा रक्षकासह १ पोलीस कर्मचारी असे ५ जणांचा समावेश आहे. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समिती निहाय नेमण्यात आलेले आहेत. 

पथकांनी त्यांच्या अखत्यारीतील प्रभागात सतत गस्त घालण्यासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करायची आहे. विना मास्क वा मास्क नीट घातलेला नसेल, गर्दी  केली असेल, बंदी असून देखील दुकाने - आस्थापना खुली असेल, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर अशांवर ठरवून दिलेल्या दंडानुसार कारवाई पथकांनी करायची आहे. पथकांमधील जगदीश भोपतराव, राज घरत आदी काही अधिकारी कारवाई तसेच दंड वसुली केल्याचे पालिककडून कळवले जाते. परंतु काही अपवाद वगळताच ही पथके कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काटेकोर आणि नियमितपणे कारवाई करत असल्याचे शहरात चित्र आहे. त्यातही प्रत्येक पथकात पोलीस कर्मचाऱ्याचा आयुक्तांनी समावेश केला असला तरी पोलीस कर्मचारी पथका सोबत येत नसल्याचे सुद्धा दिसून आले आहे. 

कोरोना संसर्ग पसरण्यास नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे महत्वाचे कारण असल्याने लोकांचा बेशिस्तपणा रोखण्यासाठी नगरसेवक - राजकारण्यांसह पोलीस व पालिका प्रशासनाने मिळून कारवाईचा कठोर बडगा उगारणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी नेमलेली पथकेच कामचुकारपणा आणि गैरप्रकार करू लागल्याने शहरात राजरोस नियमांचे उल्लंघन सुरू आहे. भाईंदर पूर्वेस रेल्वे स्थानक समोर असलेले सुरभी स्नॅक्स कॉर्नर हे नियमांचे उल्लंघन करून सुरु असल्याचे आणि दुकाना बाहेर गर्दी होत असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी रविवारी तेथील प्रभाग अधिकारी व पथकास छायाचित्रासह दिली. परंतु पथक गेले आणि सुरभी केंद्र बंद असल्याचे फोटो उपायुक्तांना पाठवून उपायुक्तांची माहिती खोटी ठरवल . 

रात्री उशिरापर्यंत सुरभी नाश्ता केंद्र सुरू असल्याचे मुठे यांना समजले. सोमवारी स्वतः मुठे यांनीच थेट सुरभी नाश्ता केंद्रावर धाड टाकली आणि बंदी असून सुद्धा ते दुकान सुरु असल्याचे सिद्ध केले. मुठे यांनी पालिका पथकास बोलावून घेऊन चालकाकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला. या प्रकरणी प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये आणि पथकाची हजेरी घेत खुलासा सादर करण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदीपासून अगदी महापालिका कार्यालयात सुद्धा वावरतात. भाज्या - मासळी आदी खरेदीसाठी प्रचंड गर्दी करणे, खाण्या - पिण्याच्या ठिकाणी सुद्धा गर्दी असते.  त्यामुळे नियमांचे पालन न करता संसर्ग पसरवणाऱ्या लोकांवर कारवाईचा कठोर बडगा उगारण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक