शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे दहा बळी; वारसांना ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. मात्र, पावसाने आतापर्यंत तब्बल दहा जणांचा बळी घेतला आहे. यातील मृतांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचे वाटप ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर केले आहे.

पावसाच्या या कालावधीत जिल्ह्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक १० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात भूस्खलनाने पाच जणांचा बळी गेला आहे. तर या दरम्यान इतर दुर्घटनांत मीरा-भाईंदर मनपा परिसरातील एकाचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात भिवंडीतील एकासह उल्हासनगर आणि शहापूरमधील प्रत्येकी एक जण मयत झाला आहे. याच शहापूरमधील एकाचा इतर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. या मृतांच्या नातेवाइकांना शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निधीचे चार लाख आणि सीएम निधीतून एक लाख असे मिळून प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना आतापर्यंत ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप केल्याच्या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या २४ घटना

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी जुलैमध्ये सर्वाधिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. या कालावधीत जिल्ह्यातील पूरस्थितीसह भूस्खलन, रोड अपघात, पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्घटनांचा समावेश आहे. या अतिवृष्टीमुळे ठाणे शहरात दोन जीवघेण्या घटनांनी नोंद आहे. याशिवाय शहापूर परिसरात सर्वाधिक २० ठिकाणांची नोंद आहे. तर भिवंडी आणि उल्हासनगर या परिसरात प्रत्येकी एक दुर्घटना आदी आतापर्यंत जिल्ह्यात २४ ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या दुर्दैवी घटना घडल्या असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनांपैकी जिल्ह्यात भूस्खलनाने पाच जणांचा जीव गेलेला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर जीवघेण्या घटनांत दोन जण असे १० मृत्यू यंदाच्या पावसात आतापर्यंत झालेले आहेत.