शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांनी फिरविली आहे पाठ ?

By admin | Published: June 23, 2017 5:07 AM

पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज

लोकमत न्यूज नेटवर्ककासा: पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळयांसमोर उभी राहते ती हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज, पण सोबतच नांगर ओढणारी, चिखल तुडविणारी बैलांची जोडी, पण आजच्या आधुनिक युगात मात्र ही बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी पॉवर टिलर वापराकडे वळतांना दिसत आहेत. खेडयापाडयातील शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोडया, बैलगाडी ही असणारच असा समज एकदा जून महिना उजाडला कि शेतकरी जमिन मशागतीसाठी नांगर दुरूस्ती करणे, नविन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नविन बैल खरेदी करणे किंवा भाडयाने आणणे. नांगरासाठी व चिखलणीसाठी लागणाऱ्या फाळासाठी मजबूत लाकूड शोधणे नांगरास दुसर शोधणे अशा कामांची शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. नांगर मजबूत टिकावू असावा यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर या सारख्या वनस्पतींच्या लाकडांचा वापर करतात.मात्र आता ग्रामीण भागातील शेतकरी मशागतीच्या कामसाठी पॉवर टिलर वापरू लागला आहे. लाकडी नागंराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांना वेळ, पैसा तसचे शरीरीक श्रमदेखील वाचतात. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीत कमी वेळात जास्त जमीन नांगरली जाते. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामासाठी एकमेकांच्या शेतात जावून मदत करत असत. परंतु आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमित पणामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतात. तसेच पॉवर टिलर भाडयाने घेण्यास शेतकऱ्याला साधारणपणे ४०० रू. प्रती तास पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत. पॉवर टिलरच्या पावरामुळे बैलगाडया आणि लाकडी नांगराच्या तुलनेत शेतकऱ्यांना आता जास्त खर्च होतो. परंतु कामे वेळेत होतात. असे शेतकरी महेंद्र पावडे म्हणतात. सध्या बाजारात एका बैलजोडीची किंमत ३० ते ५० हजारवर पोहचली आहे. तसेच भाडे तत्वावर बैलजोडयाही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे वर्षभर बैलांची राखण करणे. त्यांना खाद्य पुरविणे आदी बाबी शेतकऱ्यांना कराव्या लागतात. त्यामानाने उन्हाळयात गवत, पावसाळी वाहतूक, शेतातील धान्य वाहतूकीसाठी बैलगाडीची भाडेतत्वावर होणारी मागणीही आता खूपच कमी झाली आहे. तसेच पॉवर टिलर व ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व बचत गटांना ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाच्या कृषी विभागाकडून दिले जाते. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामांसाठी लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलकउे वळतांना दिसत आहेत.