शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

ठाण्यात २४ बाय ७ पाणीपुरवठा

By admin | Published: April 12, 2017 3:40 AM

पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास

ठाणे : पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास पालिकेने सुरुवात केली या संदर्भातील पहिला पायलट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीत राबविला जाणार असून या संदर्भातील अ‍ॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविली आहे. यानुसार पुढील तीन वर्षात या भागातील तब्बल १४ हजार ५०० ग्राहकांना २४ तास पाणी मिळणार आहे. ठाणे महापालिकेने पाणी व्यवस्था मजबुत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार रिमॉडेलींग योजना, वॉटर आॅडिट, वॉटर किआॅक्स, स्मार्ट मीटर, पाणीगळती रोखणे, चोरीवर निर्बंध घालण्यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे. महापालिका हद्दीतील सद्यस्थितीत २३.५० लाख लोकसंख्येला सरासरी २ ते ६ तास एवढ्या कालावधीत ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. आता ठाणेकरांसाठी २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पालिकेने प्रस्तावित केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प ५ वर्षात पूर्ण करण्याची पालिकेची इच्छा असून २० वर्ष कालावधीसाठी देखभाल दुरुस्तीसह राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. यामध्ये अस्तित्वातील व नव्याने अंथरण्यात येणाऱ्या वाहिन्यांचा लेखाजोखा करुन गळती शोधणे, ती बंद करणे, जलमापकांचे वाचन व त्याचे देयक वितरीत करुन प्रभावीपणे त्याची वसुली करणे आदी बाबींचा यामध्ये अंतर्भाव केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नागरिकांना २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी भारतीय मानकाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. तर वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होऊन सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटींची आर्थिक तरतूद प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी) - आता अर्थसंकल्पात नमूद केलेल्या बाबींचा विचार करुन पहिला पायलेट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या प्रभाग समितीमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. - याअंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ, जेल जलकुंभ, ऋुतूपार्क, रुस्तमजी जलकुंभाखालील वितरण व्यवस्था मजबुत करण्यात येणार असून या जलकुंभांवरुन पाणी पहिल्या टप्यात १४ हजार ५०० ग्राहकांना मिळणार असून तीन वर्षात योजना पूर्ण होणार आहे. - ही योजना अंशत: पीपीपी तत्वावर राबविली जाणार असून 70%रक्कम संबधीत विकासकाला काम सुरु असताना आणि उर्वरित रक्कम ही पुढील सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.