शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Thane: ठाणे शहरात ८८ वृक्ष उन्मळून पडली, वृक्ष प्राधिकरण विभागाला आली उशिराने जाग

By अजित मांडके | Updated: May 14, 2024 18:49 IST

Thane News: ठाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने शहरातील विविध भागात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी मात्र वाहनांचे आणि घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे.

- अजित मांडके ठाणे - ठाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने शहरातील विविध भागात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी मात्र वाहनांचे आणि घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. परंतु एवढ्याशा पावसाने वृक्ष पडल्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही धोकादायक स्थितीत शहरात किती वृक्ष आहेत, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही. सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर आता या विभागाकडून धोकादायक वृक्षांचा सर्व्हे हाती घेण्यात आला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात महापालिका हद्दीत वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. दरवर्षी हा आकडा वाढतांना दिसत आहे. परंतु त्यावर उपाय योजना करण्यात महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. २०२०-२१ या वर्षात एकूण ६२८ झाडे उन्मळून पडली होती. त्यानंतर दरवर्षी हा आकडा वाढतांंनाच दिसून आला आहे. मागील काही वर्षात शहरातील झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र वृक्ष का पडत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला वेळ नाही. यामागे शहरातील वाढलेले काँक्रीटीकरण देखील वृक्षांच्या मुळावर येत असल्याचा दावा तज्ञांनी केली आहे. काही झाडे आतून पोखरली देखील जात असल्याने ती कधीही उन्मळून पडत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला, गटारांच्या बाजूला अशा पध्दतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपणांमुळे देखील वृक्ष पडण्याच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यातही देशी प्रजातीच्या वृक्षांऐवजी विदेशी प्रजातीच्या वृक्षांना महत्व दिले जात असल्याने देखील हे प्रमाण वाढतांना दिसत आहे.

त्यानुसार मागील वर्षी मोठ्या आकाराचे वृक्ष पडण्यामागे काय कारणे आहेत, शहरात अशा प्रकारचे वृक्ष किती आहे, याचा सर्व्हे जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करुन केला जाणार होता. त्यासाठी तज्ञाची नेमणुक देखील करण्यात आली होती. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नसल्याचे आता दिसत आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या वादळी वाºयाच्या पावसात ६१ वृक्ष उन्मळून पडले होते. तर मंगळवारी पाऊस थांबल्यानंतरही दिवसभरात २७ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे. आता काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. परंतु असे असतांना आता कुठे वृक्षांच्या फांद्या छाटणीची मोहीम वृक्ष प्राधिकरण विभागाने हाती घेतली आहे. त्यातही वृक्ष पडल्याच्या घटनेनंतर आता शहरात किती धोकादायक वृक्ष आहेत, याचा सर्व्हे वृक्ष प्राधिकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे पडण्याच्या अवस्थेत असलेले वृक्ष किती याचा अंदाज वृक्ष प्राधिकरणाला बांधता आलेला नाही.

टॅग्स :thaneठाणे