शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा ‘क्वारंटाइन’ आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 06:52 IST

अंबरनाथचे ८४ फ्लॅट कोरोनाबाधितांसाठी घेतले जाणार होते ताब्यात; नव्याने निर्णय घेण्याचा हायकोर्टाचा आदेश

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंबरनाथ येथील ‘प्रसादम गृहसंकुला’च्या फेज १ मधील बांधून तयार असलेल्या ए १ व ए २ या दोन इमारतींमधील ८४ फ्लॅट नगर परिषदेस कोरोनाबाधित रुग्णांसाठी ‘क्वारंटाइन/आयसोलेशन सेंटर’ म्हणून वापरण्यासाठी अधिग्रहित करण्याचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ जून रोजी काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला असून जिल्हाधिकाºयांनी आधी निदर्शनास आणून न दिलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन दोन आठवड्यांत नव्याने निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे.

या इमारतींमधील फ्लॅट खरेदी केलेले रिद्धी अगरवाल यांच्यासह काही फ्लॅटधारक, हे गृहसंकुल विकसित करणारे आश्रय डेव्हलपर्स लि. हे विकासक आणि या जमिनीचे दर्शना दामले यांच्यासह इतर मूळ जमीनमालक यांनी केलेल्या याचिकांवर न्या. नितीन जामदार व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठानेहा आदेश दिला. हा अधिग्रहण आदेश काढल्यानंतर नगर परिषदेने त्या अनुषंगाने काही पुढील पावले उचलली असल्याने जिल्हाधिकाºयांनी नव्याने निर्णय घेईपर्यंत या फ्लॅट््सच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

या सुनावणीत फ्लॅटधारकांसाठी अ‍ॅड. नौशाद इंजिनीअर, मूळ जमीन मालकांसाठी अ‍ॅड. सैयद साहिल नागामिया, विकासकासाठी अ‍ॅड. निलेश गाला, नगर परिषदेसाठी अ‍ॅड. ए. एस. राव तर राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील पी. जी. सावंत यांनी काम पाहिले.पालिकेने वस्तुस्थिती दडवलीन्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत असे स्पष्ट झाले की, अंबरनाथ नगर परिषदेने हे फ्लॅट ताब्यात घेण्यासंबंधी मे. आश्रय डेव्हलपर्स यांना १३ जून रोजी पत्र पाठविले. हे फ्लॅट लोकांना आधीच विकलेले आहेत व त्यांना त्यांची ‘पझेशन लेटर्स’ही दिली गेली आहेत. त्यामुळे फ्लॅट क्वारंटाइन सेंटरसाठी देणे शक्य होणार नाही, असे विकासकाने १७ जूनच्या पत्राने नगर परिषदेस कळविले.असे असूनही नगर परिषदेने हे फ्लॅट््स अधिग्रहित करण्याची विनंती करणारे जे पत्र २३ जून रोजी जिल्हाधिकाºयांना लिहिले त्यात हे फ्लॅट विकले गेले आहेत, त्यांची ‘पझेशन लेटर्स’ खरेदीदारांना आधीच दिली गेली आहेत व त्यामुळे विकासकाने फ्लॅट ताब्यात देण्यास असमर्थता कळविली आहे, या गोष्टींचा उल्लेखही केला नाही.त्यामुळे हे फ्लॅट अधिग्रहणासाठी उपलब्ध आहेत, असा चुकीचा समज झाल्याने जिल्हाधिकाºयांनी २५ जूनचा आदेश काढला. परंतु आता ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आणि अशा प्रकारे लोकांनी राहण्यासाठी रीतसर विकत घेतलेले फ्लॅट कायद्यानुसार अधिग्रहित केले जाऊ शकतात का, याचा कायदेशीर विचार करून नव्याने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस