शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

यंत्राद्वारे भात लागवडीसाठी ठाणे जिल्हा सज्ज

By admin | Published: June 08, 2015 4:44 AM

यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेभात हे खरीप हंगामातील कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरातील चिखलात पारंपारिक पद्धतीने भातपिकाचे रोपण मजुरांकडून केले जाते. पण, यांत्रिक शेतीच्या युगात आता ही भात लागवड ‘भातरोवणी यंत्रा’द्वारे करण्याचे निश्चित केले आहे. राज्यात प्रथमच कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात या खरीप हंगामात पहिल्यांदा यंत्राद्वारे भाताची लागवड केली जाणार आहे. यासाठी शहापूर व भिवंडी तालुक्यांची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील या दोन तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर भातरोवणी यंत्राद्वारे लागवड केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाखाली १० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. एका यंत्राच्या खरेदीसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये किंमत मोजावी लागली आहे. यानुसार, सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या या यंत्रांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेची मदत घेतल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महावीर जंगटे यांनी लोकमतला सांगितले. मजुरांऐवजी ‘भातरोवणी’ यंत्राद्वारे या वर्षापासून भात लागवडीला प्रारंभ होणार आहे. याआधी केवळ आंध्र प्रदेश व केरळ राज्यांत या यंत्राद्वारे लागवड केली जात असे. पण, आता राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर या यंत्रांची खरेदी करून दिली आहे.