शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

ठाणे-दिवा मार्ग : पाचव्या, सहाव्या मार्गांचा खर्च ४०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:53 IST

ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गांच्या कामासाठी आतापर्यंत रेल्वेने चारवेळा डेडलाइन दिल्या. त्या चारही डेडलाइन रेल्वेने पाळलेल्या नाहीत.

कल्याण : ठाणे-दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गांच्या कामासाठी आतापर्यंत रेल्वेने चारवेळा डेडलाइन दिल्या. त्या चारही डेडलाइन रेल्वेने पाळलेल्या नाहीत. या काळात प्रकल्पाचा खर्च १५० कोटींवरून ४०० कोटींवर पोहोचला. रेल्वे प्रवाशांच्या खिशांतून तिकिटापोटी मिळालेल्या उत्पन्नातून ही उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे डेडलाइन पाळून प्रकल्प कधी पूर्ण केला जाणार, असा संतप्त सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे.रेल्वे परिषदेचे आयोजन नुकतेच आमदार आशीष शेलार यांनी केले होते. या परिषदेच्या व्यासपीठावर उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी हा गंभीर प्रश्न मांडला. पाचव्या व सहाव्या मार्गांचे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. या मार्गावर सुरू असलेल्या कामाची पाहणीही खासदारांनी केली होती. त्यानंतर, याच मार्गांवरील कामाचा काही भाग खचल्याने कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.खचलेल्या भागाचीदेखील खासदारांनी पाहणी केली होती. त्यानंतरही प्रकल्पाच्या कामात गती नसल्याने प्रवासी महासंघाच्या वतीने हा सवाल परिषदेसमोर केला. रेल्वे व रेल्वे विकास परिषदेच्या कामाविषयी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्याच्या पुढे कर्जत व कसाऱ्याच्या दिशेने प्रवासी संख्या वाढली आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांचा बळी जात आहे. रेल्वे प्रशासनाला याचेदेखील गांभीर्य नसल्याचे यातून उघड होत आहे. पाचव्या व सहाव्या मार्गांचे काम लवकर मार्गी लावून गर्दीच्या प्रवासातून प्रवाशांची सुटका करावी. कळवा ते ऐरोली या थेट मार्गाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन त्यासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी. कल्याण-कसारा या ७०० कोटींच्या तिसºया मार्गाचे काम रेल्वेकडून हाती घेतले गेले आहे. ते मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. त्याच धर्तीवर कल्याण-कर्जत मार्गावर तिसºया मार्गाच्या कामाला मंजुरी द्यावी. त्याचे काम पहिल्या टप्प्यात कल्याण-अंबरनाथ व पुढे वांगणीपर्यंत प्रथम करण्यात यावे. मुंबई ते कल्याण महिला विशेष लोकल गाडी चालवली जाते. बदलापूर व आसनगावसाठी महिला विशेष लोकल सुरू करावी. कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाच्या कामाला प्राधान्य द्यावे. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा मार्गावरील गाड्यांच्या फेºया वाढवण्यात याव्यात, आदी मागण्या परिषदेत मांडण्यात आल्या. त्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिले जाणार असल्याची माहिती यावेळी शेलार यांनी दिली. प्रकल्प लवकर मार्गी लावून प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, असे सांगण्यात आले.रेल्वे परिषदेने मानले ‘लोकमत’चे आभाररेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना यापूर्वी चार लाखांची मदत दिली जात होती. ती दुप्पट करून आठ लाख रुपये करण्यात आली. मात्र, दावे निकाली निघण्याचे प्रमाण कमी होते. लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चित्र बदलले.दावा प्राधिकरणास दोन न्यायाधीश देण्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर मशीद येथे नवीन अपघात दावा प्राधिकरण सुरू केले जाणार आहे. याबद्दल रेल्वे परिषदेने ‘लोकमत’चे आभार मानले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणmurbadमुरबाड