शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

माकडाच्या हाती मोबाइलचे कोलित दिल्याचे परिणाम

By संदीप प्रधान | Published: September 02, 2024 1:09 PM

Thane News: बलात्काराचे गुन्हे वाढले असून, जनजागृतीमुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा हा गुंता सोडवण्यात अपयश आले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे.

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक) 

बदलापूरमधील एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर चतुर्थश्रेणी कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. बदलापुरातील दडपलेली लैंगिक अत्याचाराची प्रकरणे उघड झाली. बदलापूरमध्ये जेमतेम साडेतीन वर्षांच्या मुली वासनेच्या शिकार झाल्या, तर लातूरमध्ये एका सत्तर वर्षांच्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली गेली. बलात्काराचे गुन्हे वाढले असून, जनजागृतीमुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी संबंधाचा हा गुंता सोडवण्यात अपयश आले, तर परिस्थिती अधिक बिकट होणार आहे.

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्येनंतर जनआक्रोश उफाळून आल्याने बलात्कार व हिंस्त्र पद्धतीने महिलेची हत्या करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली. देहदंडाच्या शिक्षेच्या भीतीमुळे खरेतर अशी कृत्ये करण्यास कुणी धजावणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात बलात्कारानंतर स्त्रीयांशी हिंस्त्र वर्तणूक करण्याकडील कल वाढला आहे. जबरदस्ती केलेल्या महिलेने तक्रार करू नये, याकरिता तिला संपविण्याची प्रवृत्ती वाढली आहे, हे दुर्दैव आहे. या सर्व घटनांबाबत पोलिसी निष्काळजीपणा, कुटुंबातील व्यक्तीच लैंगिक शोषण करत असेल, तर प्रकरण दडपण्याची प्रवृत्ती वगैरे बाबी आहेत. बदलापूरच्या प्रकरणातही शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी तक्रार न करण्याकरिता मुलीच्या पालकांवर दबाव टाकला. संस्थाचालक हे राजकीय पक्षांशी लागेबांधे असलेले असल्याने पोलिसांनीही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, विविध कारणांमुळे बदलापूरकरांच्या मनात दाटलेला असंतोष त्सुनामीसारखा उफाळून आल्याने भल्याभल्यांची टगेगिरी पालापाचोळ्यासारखी उडून गेली.गंभीर स्वरूपाचे गुन्हे न नोंदण्याकडे पोलिसांचा कल असल्याचा एक जळजळीत अनुभव येथे नमूद करायलाच हवा. काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. डोंबिवलीतील एका पांढरपेशा कुटुंबातील महिलेचे मंगळसूत्र मारले. ती तक्रार करायला गेली, तर पोलिसांनी तिची तक्रार न घेता अन्य कुठल्या प्रकरणात पोलिसांकडे पडून असलेले मंगळसूत्र स्वीकारण्याचा आग्रह धरला. तिने त्यास नकार दिला. हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर तत्कालीन पोलिस आयुक्तांचा तिळपापड झाला. त्यामुळे बदलापूर प्रकरणात पोलिसांनी दडवादडवी केली, हे नाकारता येत नाही.

देशात अशिक्षित व अल्पशिक्षित यांची, तसेच बेरोजगार व अर्धवेळ रोजगार असलेल्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु, अनेकांकडे स्मार्टफोन आहे. महिन्याकाठी आठ ते दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून जेमतेम स्वत:च्या गरजा भागविणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा तरुण-तरुणीकरिता भविष्यकाळ अंधकारमय आहे.

स्वत:चे घर, संसार अशी स्वप्ने पूर्ण होण्याची या वर्गाला आशा नाही व अनेकांची इच्छाही नाही. आजचा दिवस, आताचा क्षण जगायचा, अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या स्मार्ट फोनमध्ये श्रीमंतांचे शौक, पोर्न फिल्म, विद्वेष वाढवणारा कंटेंट सर्व ठासून भरले आहे. या वयोगटातील अनेकांना सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याकरिता वाचन करणे ही गरज आहे, हेही मान्य नाही. रील्स व ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसिरीज पाहण्यात ते मग्न आहेत. वेबसिरीजमध्ये स्त्रियांशी हिंसक व्यवहाराचा बेलगाम मारा आहे. रील आणि रिअल लाइफ यामधील सीमारेषा धूसर होऊन ओरबाडण्याची, कुठल्याही थराला जाऊन परिणामांचा विचार न करता आपले शौक पूर्ण करण्याची वृत्ती बळावली आहे. विचार करून कृती करण्याशी असलेली नाळ तुटलेला, असा माणूस हा माकडासारखा वागत आहे. त्यात त्याच्या हातात आपणच मोबाइलचे कोलित दिले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे