शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

स्वच्छ नव्हे हे तर विद्रुप ठाणे; शहराच्या प्रत्येक चौकात राजकीय बॅनरबाजीला उधाण

By अजित मांडके | Published: September 23, 2023 4:05 PM

राजकीय बॅनरबाजीमुळे ठाणे शहर स्वच्छ नव्हे तर विद्रुप ठाणे होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे : केंद्राच्या वतीने घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणात ठाणे महापालिका देखील सहभागी आहे. त्यामुळे ठाण्याचा पहिला नंबर यावा यासाठी महापालिका शर्तीचे प्रयत्न करीत आहे. परंतु दुसरीकडे स्वच्छ ठाण्याला सध्या शहराच्या विविध भागात अनाधिकृतपणे लावण्यात आलेल्या राजकीय बॅनरबाजीमुळे ठाणे शहर स्वच्छ नव्हे तर विद्रुप ठाणे होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरात स्वच्छता लीग हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार यात खाडी किनारे स्वच्छ करण्याबरोबर आपला परिसर स्वच्छ रहावा यासाठी शाळकरी मुलांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याची सुरवातही झाली आहे. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज शहर स्वच्छतेचे महत्व ठाणेकरांच्या मनावर बींबविन्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ठाणेकरांना शिकवितांना महापालिकेचेच आता स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र शहराच्या विविध भागात फिरल्यानंतर समोर येत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते अगदी घोडबंदर, कळवा, दिवा आदी भागातही सध्या अनाधिकृत बॅनर लावले गेल्याचे दिसत आहे. यातही प्रत्येक पक्षाची यात चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे दोन गट झाले, त्यानंतर राष्टÑवादीचेही दोन गट झाल्याने या दोनही गटांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून बॅनर लावून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रत्येक महत्वाचा चौक, उड्डाणपुलाखाली, मासुंदा तलाव, उपवन तलाव आदींसह इतर तलावांच्या ठिकाणी देखील या राजकीय पक्षांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत आहेत. 

तीनहात नाका ते अगदी घोडबंदर भागात ज्या ठिकाणी मेट्रोचा शेवटचा पिलर आहे, त्या प्रत्येक पीलवर देखील अशाच स्वरुपाचे बॅनर लावण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय बॅनरबाजीमुळे शहर अधिकच विद्रुप झाल्याचे दिसत आहे. परंतु महापालिकेने यातील एकाही बॅनरवर कारवाई करण्याची हिम्मत अद्यापही दाखविलेली नाही. तसेच अशा प्रकारचे बॅनर लावणाºयांच्या विरोधात गुन्हे दाखल देखील झालेले नाहीत. त्यामुळे शहर स्वच्छतेचा नारा देणाºया ठाणे महापालिकेला ही अस्वच्छता दिसत नाही का? असा सवाल आता ठाणेकर करु लागले आहेत.

टॅग्स :thaneठाणे