शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
2
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
3
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
4
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
5
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
6
7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती
7
भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या
8
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
9
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
10
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
11
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
12
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
13
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
14
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
15
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
16
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
17
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
18
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
19
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
20
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 2:42 PM

महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे -  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू झाले आहे. मात्र या वर्षातच भाजपा सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फसला जात आहे. या देशात सध्या अराजकता माजली आहे. सदृढ लोकशाहीचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले  होते. मात्र भाजपाचे सरकार या देशात अप्रत्यक्ष हुकूमशाही लादत आहे. महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत  ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले. या कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. तसेच राफेल करारामध्ये झालेला भ्रष्टाचार; एच.ए.एल. कंपनीला राफेल बनवण्याची क्षमता नाही या असत्याची मांडणी, सनातन या संस्थेवर बंदी न घालून हिंसेला संधी देणे, देशातील संविधानाचे दहन करणाऱ्यांना अभय देऊन अशांती निर्माण करणे आदींच्या माध्यमातून गांधींच्या सत्य -अहिंसा आणि शांतता या तत्वांना हरताळ फसला जात आहे. असे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच ५६ इंचाची छाती असल्याचे सांगून सत्ता मिळवलेल्यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित , आदिवासी, मुस्लिम, धनगर आदींच्या विरोधात मोहीम राबवली असल्याचा आरोप करून गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सरकारचा निषेध  करण्यात आला. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahatma Gandhiमहात्मा गांधी