शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
3
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
4
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
5
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
6
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
7
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
8
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
9
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
10
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
11
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
12
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
13
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
14
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
15
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
16
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
17
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
18
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
19
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
20
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...

माणुसकीला सलाम! कोरोनामुळे निराधार झालेल्या कमलाबाईना संवेदनशील ठाणेकरांनी दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 3:53 PM

कमलाबाई दळवी या ५८ वर्षीय महिलेला हॅप्पी व्हॅलीच्या शेजारील सहयोग बस स्टॉपच्या जवळ बसलेल्या भाग्यश्री अविनाश देशमुख यांना दिसल्या. पुन्हा दोन तीन दिवसांनी आजी तिथे दिसल्या म्हणून भाग्यश्री यांनी त्यांना विचारपूस केली तेव्हा कळलं की, मागील पाच ते सहा महिन्यापासून त्या तिथे राहतात. त्यांना कोणीही नाही.

ठाणे : कमलाबाई दळवी या ५८ वर्षीय महिलेला हॅप्पी व्हॅलीच्या शेजारील सहयोग बस स्टॉपच्या जवळ बसलेल्या भाग्यश्री अविनाश देशमुख यांना दिसल्या. पुन्हा दोन तीन दिवसांनी आजी तिथे दिसल्या म्हणून भाग्यश्री यांनी त्यांना विचारपूस केली तेव्हा कळलं की, मागील पाच ते सहा महिण्यापासून त्या तिथे राहतात. त्यांना कोणीही नाही. मुलबाळ नाही, नवरा आस्थामा ह्या आजाराने पंधरा वर्षा पूर्वीच वारले. कमलाबाई ह्या घरकाम करून स्वतःच  उदरनिर्वाह करीत होती. मानपाडा, शिवाजीनगर येथे त्या भाड्यानं रहात असायच्या. पण कोरोनाने हातातील सर्व कामे गेली. त्यामुळे तिथून भवानी नगरला राहायला आल्या. हजार रूपये महिना घरभाडं देत मागच्या पावसात घरात पाणी घुसून सगळे कागदपत्र भिजले व भाडं दयायला पैसे ही नाही म्हणून घरमलकाने घराबाहेर काढलं. जवळच्या असलेल्या या बस स्टॉपवरच कमलाबाईंनी संसार थाटला. सगळं चांगलं होत पण रात्री माध्यपान करणारे व दिवशी उन्हाच्या तडक्यामुळे त्याना त्रास होत होता. कोणी काही दिले तर खायचं, नाहीतर दिवसभर चहा पिऊन जगायचं पण भीक मागायची नाही. पैसे कोणाला मागायचेच नाही. असे कमलाबाई यांनी मनोमन ठरवले होते.

अचानक तौक्ती चक्रीवादळाची बातमी ऐकायला आली आणि भाग्यश्रीनी त्यांना छत्री घेऊन दिली व गप्पा मारायला गेले. पण पाऊस खूप जोरात असल्याने त्यांना झोपताही आलं नाही. तेव्हा प्लास्टिक ताडपत्री बसस्टॉप ला बांधली पण फायदा काही झालं नाही. कारण हवा, पाऊस जोरात मग कळेना काय करायचं ?  

भाग्यश्रीने त्यांना साड्या, ब्लाउज, वगैरे घेतले खायला, खाऊ, बॅग, रोजच्या लागणारे साहित्य घेतले. व  आरती भोर ह्यांनी मोफत ब्लाऊज वेळेत शिवून दिले. व अमोल जाधव ह्यांनी त्याच्या साठी जेवणाची सोय केली. व त्याना कोणता आजार किंवा काही आहे का ह्यासाठी डॉक्टर कडे ही नेण्यात आले. परंतु कायमस्वरूपी मार्ग निघावं म्हणून कोणीतरी मदत करावी या साठी भाग्यश्रीने फेसबुकचा वापर केला. फेसबुकची पोस्ट वाचून समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले यानी भाग्यश्रीला संपर्क करून काही तरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन अजयनी सायली साळवी यांच्यासह त्या कमलाबाईंची भेट घेतली आणि त्याची खरी माहिती काय  आहे ? नेमकं काय घडलं  ? व त्याना कोणी नातेवाईक , मुलं , असे कोणी आहे का ?  ही माहिती घेतली. स्वतः भाग्यश्री ह्यांनी ही माहितीचा शोध घेतला. आश्रमात ठेवायचं तर खर्च आर्थिक बळ लागणार होतं. म्हणून अजयनी धर्मवीर आंनद दिघे विचार मंच व सेवा मधील संस्थापक जयदीप कोर्डे ह्यांना संपर्क करून ठाणे महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात त्यांची सोय केली. परंतु कमलाबाईची मानसिक तयारी काही होत न्हवती. सर्वांनी मिळून त्याना समजावून मानसिक आधार दिला. व  त्यांना विश्वासात घेऊन शेवटी ठाणे महापालिकेच्या निवारा केंद्रात त्यांना दाखल केले. भाग्यश्री देशमुखच्या संवेदनशील स्वभाव आणि समता विचार प्रसारक संस्थेचे कार्यकर्ते सायली साळवी, अजय भोसले, दर्शन पडवळ, इनोक कोलीयर, रवी इसाक, ओम गायकवाड शुभम कोळी व धर्मवीर आनंद दिघे विचार मंच व सेवा संस्थेच्या संस्थापक जयदीप कोर्डे आदी ठाणेकरांनी विशेष श्रम घेतले.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या