शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

By धीरज परब | Published: October 01, 2024 9:58 PM

Thane News: महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे. ही संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे. सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

 मीरारोड - महाराष्ट्राने नेहमी धर्म आणि अध्यात्म स्वीकारले आहे . अध्यात्म व मानवतेला जोडण्याचे काम केले आहे . हि संतांची आणि वीरांची भूमी आहे . धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान पेक्षा राजकारण्यांचे अधिष्ठान हे खालीच आहे . सनातन धर्माची रक्षा करणे हि आमची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन प्रसंगी केले . 

भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग व सनातन राष्ट्रीय सम्मेलन आयोजित केले होते . सोमवारी मुख्यमंत्री यांनी उपस्थित जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज , द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सदानन्द सरस्वती जी महाराज, अनिरुद्धाचार्य महाराज , गजानन ज्योतकर गुरूजी आदींचे आशीर्वाद घेतले . यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत , खासदार नरेश म्हस्के , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , माजी मंत्री कृपाशंकर सिंह , माजी आमदार गिलबर्ट मेंडोन्सा व  रवींद्र फाटक , उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह , युवासेनेचे पूर्वेश सरनाईक , माजी नगरसेविका परीशा सरनाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आदी उपस्थित होते . 

पालघर भागातील साधूंच्या हत्येची घटना घडली त्यावेळेचे सत्ताधीश गप्प बसले होते .पण आमच्या राज्यात साधूना हात लावायची कोणाची हिम्मत होणार नाही . गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याने गोरक्षा होणार , गोशाळांना अनुदान मिळणार , गाईला चारा साठी प्रति दिवस ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले . बाळासाहेबांचे हिंदुत्व व तत्व ज्यांनी विकले त्यांचे अस्तित्व जनता मिटवेल. जो हिंदुत्वाचा  पुरस्कार करेल तो बाळासाहेंबाच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा टोला त्यांनी माज़ीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला . 

देशात आता पर्यंत अनेक प्रधानमंत्री ,  मुख्यमंत्री झाले पण गाईला  राज्यमातेचा दर्जा देण्याची हिम्मत दाखवणारे एकनाथ शिंदे आजच्या घडीला देशात एकच छप्पन इंच छाती असणारे आहेत . सनातन धर्माचे प्रतीक वृषभ म्हणजेच बैल आहे . राजस्तंभावर बैलाचे चिन्ह आहे . संसदेच्या उदघाटन वेळी पंतप्रधान यांनी  हातात सोन्याचा राजदंड घेऊन प्रवेश केला . त्या राजदंडावर देखील बैलाला स्थान आहे .  मग त्याला कापण्याची , तुकडे करून पॅकेट मध्ये भरण्याची , त्याच्या विक्रीतून आलेले पैसे तिजोरीत भरण्याची हिम्मत कसे काय देशाचा प्रधानमंत्री करू शकतो ? असा सवाल यावेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला . 

आम्हाला गौमतदाता बनायचे आहे. गाई साठी जो उमेदवार व पक्ष उभा राहील त्यांच्यासाठी आपण मनमोकळेपणे मतदान करायचे आहे . केंद्र सरकारने पण गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा ; देशाच्या अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पण तसे करावे . देशातील बहुसंख्यांकच्या भावनांचा सन्मान अल्पसंख्यांक यांना करावा लागेल . अन्यथा जगात त्यांचे ५६ देश आहेत . कोणी जर गौमातेच्या निर्णया बद्दल प्रश्नचिन्ह करेल तर त्याच्या नेतृत्वाचा अधिकार संपवून टाका असे आवाहन अविमुक्तेश्वरानंद यांनी केले . 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHinduismहिंदुइझमthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर