शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

ठाणे : वाहतूककोंडी फुटेना, अडथळ्यांचा फेरा सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 9:43 AM

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या कायम...

ठाणे : ठाणे आणि वाहतूक कोंडी हे न उलगडणारे कोडे बनले आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि कोंडी नित्याचीच झालेल्या ठाणेकरांची पावसाळ्यात आणखी हालत खराब झाली आहे. कोंडीत तासनतास अडकून रहावे लागत असल्याने त्यांची कामे खोळंबत आहेत. नोकरदारांना लेटमार्क रोजचाच झाला असून चार दिवसांपासूनची ही कोंडी शनिवारी पाचव्या दिवशीही कायम असल्याचे चित्र ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात दिसले. 

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम असताना गुरुवारी रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचा दावा संबंधित विभागाने केला आहे. खड्डे बुजविल्यानंतर कोंडी फुटेल, असे वाटत असतानाच सलग पाचव्या दिवशी वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.   

शुक्रवारी सांयकाळी वाहतूक कोंडी काहीशी कमी झाल्याचे दिसल्याने आता ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे वाटत होते. मात्र शनिवारची सकाळही वाहतूक कोंडीचीच ठरली. त्यातही शासकीय तसेच इतर काही कार्यालयांना सुट्टी असल्याने खासगी वाहनांची रेलचेल काहीशी कमी दिसली. वाहनांची संख्या कमी असली, तरी भिवंडी ते कापूरबावडीपर्यंत अन्य लहान-मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसले. अनेक वाहने एकाच ठिकाणी २० ते २५ मिनिटे थांबून होती. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरू झाली. ही कोंडी नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर नाही, तर ठाण्याच्या मार्गावर झाल्याने ठाणेकरांनाच मनस्ताप सहन करावा लागला.   

खड्डे बुजविल्याच्या दाव्यानंतरही समस्या दुपारनंतर वाहतूक काहीशी हळूहळू का होईना पुढे सरकत असल्याचे चित्र दिसून आले, मात्र रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून यावर तातडीने उपायोजना करून रोजच्या या जाचातून सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

दरम्यान गुरुवारी रात्रीपासून भिवंडी, साकेत मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे, परंतु त्यानंतरही वाहतूक कोंडी कायम असल्याने या कोंडी मागचे नेमके कारण काय आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोंडीमुळे चालक सध्या त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी