शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

तीन दिवस पाण्यावाचून ठाणेकरांचे हाल, आज पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:46 AM

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे ...

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हे काम गुरुवारी उशिरा संपल्याने तीन दिवस ठाणेकरांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. प्यायला, स्वयंपाकालादेखील पाणी नाही आणि कोरोनामध्ये बाहेर जेवायला जायचे तरी कसे, अशी बिकट अवस्था ठाणेकरांची झाली होती. शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला होता. तो पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला होता. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत होता. वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शटडाऊन घोषित केले होते. गाळ काढण्याचे काम हे गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत संपणार होते. मात्र, ते संध्याकाळी उशिरापर्यंत चालले. या कामासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. परिणामी, शहरातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, शिवाईनगर या परिसरात तीन दिवस पाणीच नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. पिण्यासाठी पाणी नाही की स्वयंपाकालादेखील नाही. कपडे धुण्यासाठी नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला. कोरोनाकाळात शक्यतो बाहेर जेवायला टाळणाऱ्या नागरिकांना हॉटेलशिवाय पर्याय नव्हता. तर काही ठिकाणी विकतचे पाणी किती घेणार, असा प्रश्न नागरिकांना पडला. यादरम्यान ठाणे महापालिकेकडूनदेखील नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नसल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले होते. गुरुवारी संध्याकाळी हे काम झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला. तर शनिवारी सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असला तरी, स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा या दरम्यान सुरू होता. तसेच मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील सुरू होता. त्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात फारसा परिणाम दिसून आला नाही. तसेच नौपाडा, कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्य्राच्या काही भागाचा पाणीपुरवठादेखील सुरू होता, असा दावा महापालिकेने केला आहे.