शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गस्त घालायला येणाऱ्या पोलीस दादाची परिसरातील नागरिकांनाही मिळणार माहिती

By धीरज परब | Published: October 02, 2022 9:06 PM

मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी ह्या अद्यावत तंत्रज्ञाना द्वारे केला आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने अद्यावत अँड्रॉइड बेस ऍप द्वारे आता पोलिसांची गस्त सुरू केली असून या मुळे गस्तीसाठी आलेल्या पोलिसदादाची माहिती परिसरातील नागरिकांनासुद्धा मोबाईलवरून मिळणार आहे. जेणे करून पोलिसांशी नागरिक सहज संपर्क करू शकणार आहेत. ४ पोलीस ठाण्यात ही यंत्रणा सुरु केली असून उर्वरित १२ पोलीस ठाण्यांमध्ये येत्या काही दिवसांतच ती सुरू केली जाणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त दिली. नागपूर, बंगळुरूपेक्षा अद्यावत तंत्रज्ञानचा वापर केला गेला आहे. 

मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी ह्या अद्यावत तंत्रज्ञाना द्वारे केला आहे.  बेंगळुरू व  नागपूर शहरात पोलीस बीटमार्शल साठी क्युअर कोड स्कॅनिंग यंत्रणा आहे . परंतु मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी त्यापेक्षा अद्यावत यंत्रणा अमलात आणली असून आता पोलिसांना क्युआर कोड स्कॅन करण्याची गरजच राहणार नाही. 

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मीरा भाईंदर मध्ये ६ तर वसई - विरार भागात १० पोलीस ठाणी आहेत. आणखी काही नवीन पोलीस ठाणी सुद्धा सुरु होणार आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणारे बिट मार्शल यांची माहिती परिसरातील नागरिकांना होत नाही. तर बिट मार्शल हे खरंच गस्त घालतात का ? याची सुद्धा खात्री अनेकवेळा देता येत नाही. नागरिकांना आपल्या भागात पोलीस गस्त घालत आहेत याची माहिती व्हावी व पोलिसांची उपस्थिती आणि सुरक्षेची खात्री होण्याच्या अनुषंगाने या दोन्ही शहरात ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता पोलिसांची गस्त चालणार आहे. 

१ ऑक्टोबर पासून काशीमीरा , माणिकपूर , पेल्हार आणि विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिट मार्शल यांची गस्त ह्या एप द्वारे सुरु करण्यात आली आहे.  उर्वरित पोलीस ठाण्यातील पोलिसाना त्या एप व वापरण्याची पद्धत याची माहिती देण्याचे काम सुरु आहे. पोलिसांच्या मोबाईल मध्ये हे एडव्हान्स अँड्रॉइड व जिओ टॅगिंग बेस एप डाउनलोड केले असून त्यांच्या हद्दीतील ठरवलेल्या गस्ती पॉईंटच्या २० मीटर परिधात ते बिट मार्शल पोहचताच पॉपअप होईल व त्या पोलिसाने ओके करताच त्याची नोंदणी होईल. जेणे करून त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , सहायक आयुक्त , उपायुक्त व आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात त्याची माहिती होणार आहे.  

इतकेच नव्हे तर परिसरातील रहिवाशी , बँक वा महत्वाच्या आस्थापना यांनी शमहती दर्शवल्यास त्यांच्या मोबाईल मध्ये गस्त घालण्यासाठी आलेल्या पोलिसांचे नाव , भ्रमणध्वनी क्रमांकची माहिती संदेश द्वारे मिळणार आहे. जेणे करून आपल्या भागात पोलीस आले आहेत हे त्यांना कळणार आहे.  नागरिक बिट मार्शल सोबत कॉल वर वा प्रत्यक्ष सुद्धा भेटून बोलू शकणार आहेत. गस्ती पॉईंट वर पोहचण्याची आणि निघण्याची वेळ सुद्धा आपोआप नोंद होणार आहे. त्या गस्ती पॉईंट वर बिट मार्शल ३ ते ५ मिनिटे थांबणार आहेत.  

प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ४ बिट तर एका बिट चे सुमारे १५ ते  २० पॉईंट धरून रोज १२०० ते १५०० पॉइंटवर दोन पाळ्यां मध्ये पोलिसांची गस्त नोंद होणार आहे. ह्यात भविष्यात वाढ सुद्धा होणार आहे. ह्या यंत्रणे साठी आयुक्त व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीदळवण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस निरीक्षक आरिफ सय्यद व त्यांच्या पथकाने  मेहनत घेतली आहे.  

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे