शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:13 IST

नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला.

सुरेश लाेखंडेलाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले विजूभाऊ (नाव बदलले आहे) मोलमजुरी करतात. बँकेत गेल्यावर अंगठा देताना त्यांना लाज वाटायची. बहुधा अंगठा देत-देत आपण सरणावर जाणार, अशीच त्यांची धारणा होती. केंद्राच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमात धडे गिरवून विजूभाऊ आता नाव लिहायला शिकले आणि नवसाक्षराची परीक्षाही उत्तीर्ण झाले. आपण साक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर त्यांना हर्षवायू होणे बाकी होते.

नवभारत साक्षरता कार्यक्रमात १५ ते ६६ वयोगटातील निरक्षरांच्या १७ मार्च राेजी झालेल्या परीक्षेचा निकाल साेमवार, ६ मे रोजी घाेषित झाला. ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ७७ निरक्षर पुरुष, महिला, मुले उत्तीर्ण हाेऊन आता साक्षर झाली. यामध्ये सर्वाधिक १० हजार २४८ महिलांचा समावेश आहे. हा कार्यक्रम २०२२-२७ या कालावधीत राबविला जात आहे. यामध्ये १५ व त्यापुढील सर्व निरक्षरांसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्च रोजी राज्यात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर झाली. त्यात चार लाख ५९ हजार ५३३ परीक्षार्थी हाेते. त्यांपैकी चार लाख २५ हजार ९०६ जण उत्तीर्ण झाले. 

ठाण्याचे जिल्हाधिकारी अशाेक शिणगारे, ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे यांच्याकडून उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन करण्यात आल्याची माहिती नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनाेर यांनी ‘लाेकमत’ला दिली. जिल्हाभरातून या परीक्षेला १६ हजार ६८३ परीक्षार्थी बसले हाेते. त्यांपैकी २,९५० महिला व ६५६ पुरुष अनुत्तीर्ण झाले. त्यांची परीक्षा पुन्हा सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे.

आम्हाला वयाच्या या टप्प्यावर शिक्षणाची संधी मिळाली. आम्ही आमचे रोजचे कामधंदे सांभाळून शिक्षण घेत आहोत.- अरुण भवाने, वांगणी

अनेक कारणांमुळे नियमित शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या निरक्षरांना पुन्हा अक्षरओळख व गणितीय क्रियांसारख्या मूलभूत शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिवाय त्यांच्यात नवी उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला.- राजकुमार पाटील, शिक्षक, वांगणी.

गावात शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षण घेता आले नाही; परंतु आता या अभियानामुळे मी वाचन तसेच व्यवहारात उपयोगी गणिती आकडेमोड करू लागल्याचा आनंद वाटतो.- वनिता बंधू वाघ, चिंचपाडा, शहापूर.उतारवयात शाळेत जाण्याचा अनुभव आनंदी व उत्साहवर्धक होता. आता मी लिहू शकते, वाचू शकते.- विमल केशव पाटील, केल्हे, भिवंडी.पुन्हा एकदा आमच्यात शिक्षणाची गोडी रुजविली गेली. बिकट आर्थिक स्थितीमुळे आमचे शिक्षण थांबले होते. आता नव्याने अक्षरओळख व गणिताची आकडेमोड करताना आनंद मिळतो.    - राजेश भोपळे, वांगणी.

टॅग्स :Educationशिक्षण