शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

उल्हासनगरात वालधुनी नदीचे पाणी शिरल्याने शेकडोचे संसार उघडयावर

By सदानंद नाईक | Published: July 19, 2023 4:41 PM

उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

उल्हासनगर - संततधार पावसाने वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदी किनाऱ्यावरील भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधी नगर, हिराघाट, मातोश्रीनगर, राजीव गांधीनगर आदी ठिकाणी नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने, शेकडोचे संसार उघडयावर पडले. महापालिकेने नदी किनारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन बाधित शेकडो नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. 

उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्रभर संततधार पाऊस पडल्याने, सकाळ पासूनच भारतनगर, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, इमलीपाडा, हिराघाट, मातोश्रीनगर, राजीव गांधी नगर, करोतीयानगर परिसरात पुराचे पाणी घुसण्यास सुरवात झाली. नागरिकांनी हातात मिळेल ते सामान वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील कपडे, साहित्य व अन्नधान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या शेकडो जणांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पुराच्या पाण्याची पाहणी करून नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

वालधूनी नदी किनारा परिसरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर, सीएचएम कॉलेज, आम्रपाली शाळा, सेंट जोशेफ, ग्रँड गुरुकुल आदी अनेक शाळेत पुराचे पाणी घुसल्याने, शाळांना सुट्टी देण्यात आली. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळेत पुराचे पाणी घुसून, शैक्षणिक साहित्यासह संगणक भिजून गेले. तसेच सतर्कता म्हणून पुरक्षेत्रातील वीजपुरवठा महावितरण विभागाने बंद केला. सी ब्लॉक, शहाड फाटक, राजीव गांधीनगर, आयटीआय कॉलेज, फर्निचर मार्केट, शांतीनगर आदी ठिकाणीही पाणी साचून पुरपरिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. 

धोकादायक घर जमीनदोस्त

कॅम्प नं-३ येथील पंजाबी कॉलनी येथील एक घर धोकादायक झाल्याची माहिती महापालिकेकडे आल्यावर, महापालिका अतिक्रमण पथकाने दुपारी घर जमीनदोस्त केले. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच शहरातील घोषित धोकादायक इमारतीकडे महापालिकेचे लक्ष असल्याचे शिंपी म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरRainपाऊस