शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

राजभवनाकडे निघाला होता मोर्चा, जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 1:17 PM

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

ठाणे/मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राजस्थानी आणि गुजराती नसतील तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ डॅा.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे पोलिसांनी डॅा.जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे घेतले ताब्यात. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेत राजभवनावर जाण्यापासून रोखले. यावेळी, बोलताना आव्हाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टिका केली. महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीचा अपमान कोणी ही सहन करणार नाही. जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर वक्तव्य केले होते तेव्हाच त्यांना हकलण्याची वेळ आली होती. पण, आता अती झाले. मराठी माणूस भिकारी आहे असं त्यांना वाटत असेल तर मराठी माणूस भिकारी नाही. या मातीने अनेकांना श्रीमंत केले आहे, पण मराठी माणूस संस्कृतीने आणि संस्काराने श्रीमंत आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. 

पोलिसांनी ताब्यात घेतलं म्हणजे पोलिसांचे ते काम आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही, शेवटी पोलीस कायदा सुव्यवस्थेचं काम करतात. आता, मराठी माणसाला फक्त भिकारी म्हणायचे बाकी होतं. सगळ्याच गोष्टी मीडियाला सांगितल्या, तर माझ्याकडे काय राहणार. काही तरी गुपित ठेवला पाहिजे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी