शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा

By सदानंद नाईक | Published: August 15, 2022 5:10 PM

देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले.

सदानंद नाईक -

उल्हासनगर - निर्वासिताचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमधील टाऊन हॉल येथे १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी फाळणी अनुभवलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणीला उजाळा देताच, जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांच्यासह उपस्थितांच्या अंगावरही शहारा उभा राहिला. 

देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले. फाळणीची सर्वाधिक झाळ या नागरिकांना बसली. जमीन जुमला आणि आपले नातेवाईक सोडून हे लोक येथे आले होते. यांमध्ये सर्वाधिक लोक हे सिंधी समाजाचे होते. व्यवसायाभिमुख असलेल्या सिंधी समाजाने आज सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविला. देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त १४ ऑगस्ट रोजी टाऊन हॉलमध्ये विभाजन विभाषिका दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ नागरिक व स्वातंत्र सेनानी यांचा जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

देशाच्या फाळणीचे थरारक क्षण येथील जेष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय सांगू लागताच सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला. जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांनी निर्वासित सिंधी समाजाचे कौतुक केले. कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त अजीज शेख, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार कोमल ठाकूर, आदी उपस्थित होते. 

देशाची फाळणी झाली त्याचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावेळी भोगलेल्या वेदनांविषयी आताच्या पिढीला माहिती व्हावी. यासाठी अशा प्रकारचा स्मृती दिन पहिल्यांदाच देशात आणि राज्यात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले. 

ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे निर्वासीतांची संख्या जास्त असल्याने याठिकाणी हा कार्यक्रम घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीची चेतना जागविण्याचे काम अमृत महोत्सवाच्या माध्यमातून हेत असल्याचे सांगत उल्हासनगरमधील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी आमदार आयलानी यांनी मनोगत व्यक्त केले. फाळणीचा काळ अनुभवलेल्या देविदास जयसवानी आणि मीना रुपचंदानी यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी प्रास्ताविक केले

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनulhasnagarउल्हासनगर