शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

...तर गैरवर्तणुकीचे प्रकार सुरूच राहतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:24 AM

कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत ...

कल्याण : वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यात रिक्षांचे प्रमाण लक्षणीय असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घ्यायचा आणि दुसरा व्यवसाय करायचा, असेही महाभाग असल्याने अशांच्या रिक्षा चालविण्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारणी, उद्धट व उर्मट वागणूक प्रवाशांना दिली जात आहे. कल्याणमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या छेडछाडीच्या प्रकरणावरून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी बोध घेत बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या १५ ते १६ वर्षांच्या मुलांकडेही वेळीच लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा रिक्षाचालकांकडून टवाळखोरीचे, गैरवर्तवणुकीचे घडणारे प्रकार यापुढेही सुरूच राहतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

परवाना आणि बॅच असलेल्या व्यक्तीलाच रिक्षा चालवता येते. परंतु, काही रिक्षाचालक ज्याच्याकडे बॅच आणि परवाना नाही, अशांना रिक्षा चालवायला देत आहेत. यात १५ ते १६ वर्षांची अल्पवयीन मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतोच. त्याचबरोबर बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात ते रिक्षा चालवतात. तसेच स्टॅण्ड सोडून इतर ठिकाणांहून ते भाडे घेतात. गुटखा, माव्याने तोंडाचा तोबरा भरलेला असतो. काही वेळा मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही त्यांनी केलेले असते. उद्धट, उर्मट वागणूक, त्याचबरोबर मनमानी भाडे आकारणी ते करत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात असून, यात रिक्षा व्यवसायही एकप्रकारे बदनाम होत चालला आहे.

प्रवास बनलाय धोकादायक

अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक बनला आहे. अशा टवाळखोर रिक्षाचालकांकडून प्रवाशाचे अपहरण करणे, त्यांना लुबाडणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, फरफटत नेणे आदी प्रकारही याआधीही घडले आहेत. अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

----------