शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

Thane: ... तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, संमेलनाध्यक्ष राजन गवस यांनी व्यक्त केली चिंता

By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 30, 2023 4:31 PM

Thane: आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल अशी चिंता जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली.

-  प्रज्ञा म्हात्रेठाणे - आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल अशी चिंता कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली. आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे. तेव्हा जबाबदारी लिहीणाऱ्याची येते. त्यामुळे या आजारी महाराष्ट्राचे किमान संवेदनशील महाराष्ट्रात रुपांतर करणे ही आजची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.

रविवारी आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहामध्ये हे संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गवस म्हणाले की, मी गेली ४४ वर्षे लिहीत आहे, परंतू कधी नव्हे तर महाराष्ट्र हा आजारी पडला आहे, हा आजारांचा प्रदेश आहे. सामान्यांच्या प्राथमिक गरजा भागवणारी कल्याणकारी राज्याची संकल्पना होती. परंतू या संकल्पनेपासून आपण खूप दूर जाऊन नव्या भांडवली व्यवस्थेत आहोत, जिथे महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र ही मरणपंथावर आहेत, मल्टीस्पेशलिटीने गोरगरिबांचे शोषण केले आहे, शिक्षणाची मंदिरे न राहता तिथे दुकानदारी सुरू झाली आहेत.

एका बाजूला आरोग्याची हेळसांड, दुसरीकडे शिक्षणाची दुकानदारी सुरू आहे तर तिसऱ्या बाजूला संपूर्ण शेतीची उद्ध्वस्थता आहे. नद्यांची गटारे झाली आहेत, महानगरात येणाऱ्या सगळ्या महामार्गांमुळे असंख्य शेतकरी भूमीहीन होत आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे,पर्वतरांगा कोसळत आहेत, यात गोरगरीब मरत आहे, या गोरगरिबाचा श्वास आपल्या साहित्याच्या केंद्रापर्यंत कधीतरी यायला हवा. साहित्यिकाच्या मनात या संपूर्ण व्यवस्थेचे प्रश्न येणे गरजेचे आहे. सगळीकडे संशय आणि संभ्रम आहे, आवाजांचा गलबलाट, गोंगाट आहे आणि यातून निर्माण झालेला संभ्रम समाजाला मनोरुग्ण करत आहे. त्यामुळे या समाजाला आता मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे.  सामान्य माणसासाठी त्याने आवाज बुलंद केला पाहिजे असे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले.दरम्यान, कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष सुनील चौधरी, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत ज्येष्ठ कवी अशोक बागवे, जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, विलास जोशी, विलास ठुसे व इतर मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला बहर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी