शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

दूषित पाणी प्यावे लागत असल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:51 IST

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, टँकरने पुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

- रोहिदास पाटील अनगाव : भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोगाव, ब्राह्मणपाडा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीपाड्यात पावसाळा संपल्यापासून येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना खड्ड्यातील दूषित पाणी प्यावे लागत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.भिवंडी पालिकेच्या प्रभाग-१ मध्ये हा पाडा येतो. या पाड्यात १५ वर्षांपासून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल व विहीरही केलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना खड्ड्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यासह इतर सुविधांचीही येथे वानवा आहे. ज्या महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, त्याच पालिकेच्या आदिवासीपाड्यात पाण्यासह स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.उन्हाळ्यात खड्ड्यातील तर पावसाळ्यात पावसाचे पडणारे नाल्यातील दूषित पाणी पिण्याची येथील ग्रामस्थांवर वेळ आल्याने स्वच्छतेचा पुरस्कार घेणारे पालिका आयुक्त मनोहर हिरे या पाणीटंचाईकडे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील आदिवासींनी केला आहे.पाणीटंचाईसंबंधी येथील महिलांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता ए.एल. गायकवाड, सहायक आयुक्त बाळाराम जाधव यांची भेट घेऊन तक्र ार केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सुरेखा चौधरी यांनी दिली. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही येथील महिलांचे म्हणणे आहे. या पाड्यातील टंचाईकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करत असल्याने महिला संतापल्या आहेत. या पाड्यात पालिकेने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पाणीटंचाईमुळे खड्ड्यातील दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. या पाड्यात पालिकेने बोअरवेल मारून टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना पालिकेवर मोर्चा काढणार आहे. - सागर देसक, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, भिवंडी शहर तालुकाया पाड्यात टंचाई आहे. ग्रामस्थांनी तक्र ारी केलेल्या आहेत. यासंबंधी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.- बळीराम जाधव,सहायक आयुक्त

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई