शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा; वऱ्हाळादेवी तलावावर साचले कचऱ्याचे ढीग

By नितीन पंडित | Published: May 05, 2023 7:04 PM

भिवंडीत कचऱ्यांचे ढीग साठले आहेत.

भिवंडी: भिवंडीत स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र शहरात ठीक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांवरून पाहायला मिळत आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२३ मध्ये भाग घेतला असून शहरात ठीक ठिकाणी पडीक भिंतींना रंग देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या भिंतीवर स्वच्छतेबाबतचे सुविचार काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सध्या महापालिका प्रशासन करत आहे. मात्र या रंगविलेल्या भिंतींच्या खालीच कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

भिवंडी शहराला दोन एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या वराळदेवी तलावाच्या बाजूला असलेल्या विसर्जन घाटाच्या परिसरात महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाची माहिती देण्यासाठी माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाची माहिती देणारे भिंती रंगवले आहेत. या रंगविलेल्या भिंतींखालीच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर म्हणून भिवंडी महापालिकेला मागील काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे मात्र पुरस्कार प्राप्त होऊनही आजही शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

मागील नऊ महिन्यांपासून भिवंडी महापालीकेत प्रशासकीय राजवट असून या प्रशासकीय राजवटीत शहरातील कचरा समस्या अधिक गंभीर झाली असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ नागरिकांच्या कचरा समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दुसरीकडे शहरात कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांवर मात्र कोट्यावधी रुपयांची उधळण मनपा प्रशासन करत आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी