शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

वर्षभरात साडेसात कोटींचा मुद्देमाल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 3:11 AM

पोलीस-जनता संबंध अधिक दृढ होणार : ६८ फिर्यादींना मिळाला चोरीतील ५४ लाख ९६ हजारांचा ऐवज

ठाणे : गेल्या संपूर्ण वर्षभरात ६१६ तक्रारदारांना त्यांचा जबरी चोरी तसेच इतर गुन्ह्यांतील सात कोटी ५० लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अभिहस्तांतरित केला. तर, सोमवारी ६८ फिर्यादींना ५६ लाख १२ हजारांचा ऐवज परत केला. अशा प्रकारे मुद्देमाल हस्तांतरणाच्या माध्यमातून पोलिसांवरील जनतेचा विश्वास वाढणार असून या दोघांचेही संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी व्यक्त केला.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ च्या वतीने जबरी चोरी, चोरी तसेच वाहनचोरीतील गुन्हे उघड केल्यानंतर आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल ६८ जणांना सोमवारी स्वामी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्टÑ पोलीस दलाच्या स्थापना दिवसानिमित्त २ जानेवारीपासून पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत उपायुक्त कार्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, डायघर आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून लुटीस गेलेल्या ऐवजाचे उत्कृष्टरीत्या अन्वेषण करून हे गुन्हे उघड केले. वर्षभरात सोनसाखळी जबरी चोरी तसेच इतर गुन्ह्यांमधील चार हजार ६३६ ग्रॅम (चार किलो ६२६ ग्रॅम) वजनाचे एक कोटी ५२ लाख ९२ हजार ६२८ किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच १०९ दुचाकी, २८ तीनचाकी, ५५ चारचाकी वाहने असा तीन कोटी ८२ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत झाला. याशिवाय, एक कोटी तीन लाख ६८ हजार ७०० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ८६ व्यक्तींची एक कोटी १० लाख ५६ हजार ६८२ ची रोकड जप्त केली. असा २०१८ या संपूर्ण वर्षभरात सात कोटी ५० लाख सात हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ९१ लाख ७९ हजारांचे तीन किलो ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने परत केले. तर ७५ दुचाकी, २७ तीनचाकी, ३४ चारचाकी वाहनांसह मोबाइल, लॅपटॉप आणि २९ तक्रारदारांची ९५ लाख ४८ हजार ८३७ रुपयांची रोकड असा पाच कोटी चार लाख ७४३ रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत केला. याव्यतिरिक्त रेझिंग डे च्या अनुषंगाने ७ जानेवारी रोजी सोनसाखळी जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांतील २१ लाख ८७ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १४ दुचाकी, दोन तीनचाकी, पाच चारचाकी अशी २१ लाख ५५ हजार ७४२ हजारांच्या वाहनांसह ५४ लाख ९६ हजार ७७० किमतीचा मुद्देमाल ६८ फिर्यादींना स्वामी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.पोलीस जनतेसाठी असून चोरीतील ऐवज पुन्हा मिळवून दिल्यास जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होतो. जनता-पोलीस दुरावा दूर झाला पाहिजे. तेव्हा गुन्हेगारांवर नक्कीच वचक राहील. नागरिक हे साध्या वेशातील पोलीस असून अशा उपक्रमांद्वारे पोलीस-जनता संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, अभय सायगावकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, रविकांत मालेकर, शेखर बागडे, मंगेश सावंत आणि तुकाराम पोवळे आदींसह फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.माझी १४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी १९ आॅगस्ट २०१८ रोजी सिद्धी टॉवर येथून चोरट्यांनी जबरीने चोरली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर नौपाडा पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मेहनतीने चोरट्यांकडून १० ग्रॅमचे सोने हस्तगत केले. ते आज परत मिळाले. खूप आनंद झाला. तो शब्दांतही व्यक्त करता येत नाही.’’- शरयू फणसे (८०),फिर्यादी, नौपाडा, ठाणेआईची सोनसाखळी गेली तेव्हापासून आजपर्यंत कोणताही पाठपुरावा करावा लागला नाही. थेट सोनसाखळी चोरट्यांकडून मिळवल्याचे पोलिसांकडून समजले. त्यानुसार, त्यांनी हस्तांतरण कार्यक्रमात सोने परत केले. पोलिसांचे खूप आभारी आहोत.’’- डॉ. समीर फणसे, नौपाडा, ठाणे (फिर्यादी शरयू यांचे चिरंजीव)

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका