शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

बाजार समितीत शेतमालाला उठाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:42 AM

कल्याण : लॉकडाऊन होईल या भीतीने तयार असलेला शेतमाल शेतकऱ्यांनी शनिवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) विक्रीसाठी पाठवला ...

कल्याण : लॉकडाऊन होईल या भीतीने तयार असलेला शेतमाल शेतकऱ्यांनी शनिवारी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, आवक चांगली होऊनही शेतमालाला शनिवारी उठाव नव्हता. जवळपास २५ गाड्या शेतमाल पडून होता. त्यामुळे किमान २५ लाख रुपयांचे नुकसान व्यापारी आणि शेतकरी वर्गाला सोसावे लागले आहे.

कल्याण एपीएमसी ही नवी मुंबईनंतरची दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. तेथे कोरोनापूर्वी शेतमालाच्या जवळपास २२५ गाड्या दररोज येत होत्या. मात्र, कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला होता. आताच कुठे एपीएमसीतील व्यापार पूर्ववत होत असताना कोरोनाचे रुग्ण वाढल्याने केडीएमसीने सर्व आस्थापनांना विविध निर्बंध लावले. कोरोनाने उच्चांक गाठला होता तेव्हाही बाजार समितीला सूट दिली होती. आता पुन्हा बाजार समिती ५० टक्के क्षमतेने सम-विषम तारखांनुसार सुरू ठेवण्याचे आदेश काढले.

लॉकडाऊनच्या भीतीपोटी एपीएमसीत शनिवारी शेतमाल खरेदीसाठी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मालाची १२५ गाड्यांची आवक झाली आहे. आवक ५० टक्के क्षमतेनुसार चांगली झाली. मात्र, मालाला उठाव नव्हता. सध्या कोरोनामुळे बाजारात ग्राहक फिरकत नाहीत. सायंकाळी ६ वाजता सर्व काही बंद होत असल्याने ग्राहक येत नाहीत. बाजार समितीचा व्यापार हा पहाटे २ ते दुपारी १२ दरम्यानच्या वेळेत होतो. त्यानंतर ग्राहक एपीएमसीत फिरकत नाहीत. २५ गाड्या माल पडून होता. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक सदस्य व व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी दिली आहे.

नाशीवंत माल फेकून देण्याची वेळ

- एपीएमसीचे संचालक सदस्य व व्यापारी संघटनेचे मोहन नाईक म्हणाले, शनिवारी माल पडून होता. तसेच कोरोनामुळे रविवारी एपीएमसीचा व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात येताे. रविवारी व्यापार सुरू ठेवण्याची व्यापाऱ्यांची मागणी बाजार समिती संचालक मंडळाने मान्य करून तसा ठरावही केला. मात्र, पोलीस या ठरावाला जुमानत नसल्याने बाजार बंद असतो.

- दुसरीकडे रविवारी एपीएमसी बंद असल्याने शनिवारी उरलेला माल फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार आहे. त्यात पालेभाज्या, कोथिंबीर व अन्य नाशीवंत भाजीपाला आहे. त्यात सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने एपीएमसीचे कर्मचारी शनिवारी कामावर नसतात. त्यामुळे शनिवारी प्रशासकीय कामकाजात अडथळे येतात.

---------------