शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

मतदारयाद्यांचा घोळ काही संपेना

By admin | Published: June 30, 2017 2:46 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ जूनला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. त्यात प्रचंड घोळ असून

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ जूनला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. त्यात प्रचंड घोळ असून त्याला जबाबदार असलेल्या प्रशासनाच्या कारभाराविरोधात तसेच प्रसिद्ध झालेल्या यादीत दुरुस्तीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याचे मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी पालिकेने प्रारूप मतदारयादी तयार केली असली, तरी त्या कामासाठी नियुक्त केलेल्या सुमारे ५०० केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप सावंत यांनी केला. २५ जूनला याद्या प्रसिद्धीची मुदत असताना ती २७ जूनला केवळ संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. छापील याद्या २८ जूनला प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या, तरी आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र त्या याद्या दिसत नसल्याचा दावाही त्यांनी केला. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांत प्रचंड घोळ असून प्रभाग २४ (उत्तन) मधील बहुतांश मतदारांची नावे प्रभाग २० (नयानगर) मध्ये दाखवली आहेत. तसेच काशिमीरा येथील सृष्टी परिसरातील इमारती नयानगरमध्ये दाखवण्यात आल्याने या इमारती नयानगरमध्ये कशा शोधाव्यात, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे. त्यातच, या याद्यांत एकाही मतदाराचे छायाचित्र नसल्याने बोगस मतदानाला वाव मिळणार असल्याचा दावा केला. नेहमीप्रमाणे एका मतदाराचे नाव दुबारऐवजी तीन ते चार वेळा छापल्याचे दिसून आले आहे. मतदारांच्या माहितीसाठी तयार केलेल्या अ‍ॅपमध्ये मतदारांच्या नावांची नोंद योग्य असल्याचे दिसून येत असले, तरी यादीमध्ये त्यांच्या नावांची नोंद वेगळ्याच प्रभागांत दाखवली आहे. काहींची नोंद अ‍ॅपमध्ये दिसत असली, तरी यादीमधील नोंदीत ती व्यक्ती अस्तित्वातच नसल्याचे दाखवले आहे. मतदारनोंदणी मोहिमेद्वारे सुमारे ५१ हजार अर्ज दाखल झाले होते. त्यातील ४१ हजार २९६ अर्जांतील नोंद याद्यांत समाविष्ट करण्यात आली असून त्यातील सुमारे ३२ हजार नोंदींत घोळ आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारामतदाराच्या एकाच नावासह त्याचे छायाचित्र यादीत समाविष्ट करून पुनर्सर्वेक्षणानुसार आवश्यक दुरुस्ती करावी, या मागणीसाठी काँग्रेस थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे. त्यावर कार्यवाही न झाल्यास प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे. तत्पूर्वी त्याचे निवेदन नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांना देण्यात आले. या वेळी गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद सामंत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासन सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.