शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

वाहतूक सुरक्षा सप्ताहाची गरजच पडू नये

By admin | Published: January 10, 2017 6:21 AM

आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी

ठाणे : आयुष्य अतिशय सुंदर आहे. कोणत्याही कारणासाठी केलेली घाई जीवापेक्षा महत्त्वाची नाही. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांनी सजग राहण्याचे आवाहन करतानाच सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्नासाठी कार्यक्रम घेण्याची गरज पडता कामा नये, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सोमवारी येथे केले.सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक विभागाच्या वतीने साकेत मैदानावर ‘माझी रिक्षा माझी दीक्षा,’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे उपस्थित होते. यावेळी बोलताना कपिल देव यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व आॅटोरिक्षाचालकांना सांगितले. क्रिकेट खेळताना खेळाडू पूर्वी हेल्मेट, गार्ड यासारख्या सुरक्षाविषयक साहित्यांचा वापर करीत नव्हते. काळानुरूप परिस्थिती बदलली. आता सुरक्षाविषयक साहित्य वापरल्याशिवाय खेळाडूला मैदानावर प्रवेशच मिळत नाही. आॅटोरिक्षाचालकांनीही सुरक्षेचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. स्वत:च्या आणि इतरांच्याही सुरक्षेची जबाबदारी चालकांवर असते. त्यामुळे गाडी चालवताना मोबाइल फोनचा वापर करणे, उगाच घाई करणे, नियमांचे पालन न करणे सर्वांसाठीच घातक आहे. मुंबई संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे येथील आॅटोरिक्षाचालकांची जबाबदारी जास्तच आहे, असे कपिल देव यावेळी म्हणाले.रिक्षाचालकांनी नेहमी सजग असावे. गाडीत बसलेला प्रवासी संशयास्पद वाटल्यास लगेच पोलिसांना कळवावे. यातून संभाव्य गुन्हे टाळता येतील, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सर्व चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची दीक्षा दिली. नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना गणवेश आणि वाहतूकमित्र सामग्रीचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्रीदीप्ती भागवत यांनी केले. (प्रतिनिधी)