शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

आग विझवायला गेले; पण पाण्याविना, स्थायी समितीत झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:16 IST

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती.

ठाणे : महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका ठिकाणी महिनाभरापूर्वी आग लागली होती. ती विझवण्यासाठी गेलेल्या टँकरमध्ये पाणीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. परंतु, असे असतानाही अग्निशमन विभागाने तयार केलेल्या अहवालात त्यावेळेस पाइपमध्ये पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.स्थायी समितीची बैठक सुरू होताच म्हस्के यांनी या मुद्याला हात घातला. महिनाभरापूर्वी महापालिकेच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयात आग लागली होती. त्यावेळेस प्रत्यक्ष ठिकाणी मी हजर होतो, त्यावेळेस अग्निशमन विभागाची एक गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळेस कर्मचारी पहिल्या मजल्यापर्यंत पाइप घेऊन गेले आणि तो सुरूकेला असता त्यात पाणीच नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली, असे म्हस्के म्हणाले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एखाद्या टँकरमध्ये पाणी नाही, याची कल्पना अग्निशमन विभागाला नव्हती का, असा सवालही त्यांनी केला. त्यावेळेस अग्निशमन केंद्र जवळ असल्याने दुसरी गाडी मागवून ती आग विझवण्यात आली. मात्र, एखाद्या लांबच्या ठिकाणी अशी घटना घडली असती, तर त्याला जबाबदार कोणाला ठरवले असते, असा सवालही त्यांनी यावेळी केला.तसा अहवालच तयार केलेला नाही : काळेविशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने याविषयी जो अहवाल तयार केला आहे, त्यामध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा पाठवलेल्या टँकरमध्ये पाणी होते, असा हवाला दिला आहे. त्यामुळे अग्निशमन विभाग केवळ आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करीत असून ज्या कोणी अधिकाºयाने ती केली, त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली. परंतु, तसा अहवाल तयार केला नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. तसेच ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस पहिल्या टँकरमध्ये पाणी नसल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला. अखेर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनीया प्रकरणाची चौकशी करून दोषींवरकारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिल्याने या वादावर पडदा पडला.

टॅग्स :thaneठाणेfireआग