शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

Eknath Shinde : "हे सरकार टिकणार कारण हे सर्वसामान्य जनतेचं सरकार"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

By अजित मांडके | Published: August 26, 2022 3:13 PM

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघें आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले.

ठाणे - आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही, मात्र हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, त्यामुळे ते टिकणारच असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला आहे. काही लोकांना ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही की एकनाथ शिंदे कसा हा डोलारा सांभाळतील मात्र बाळासाहेब ठाकरे आणि या आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळावर येऊन त्यांनी आनंद दिघें यांना अभिवादन केले. त्यानंतर आनंद दिघें यांच्या आठवणींना उजाळा देताना विरोधकांचाही समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघें आपल्यात शरीराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उघडू शकत नाही. त्यांचा त्याग आपण पहिला. बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांनी पोहचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिली. त्यांचं आपल्यातून निघून जाणं ही वेदना आहे आपण जो इतिहास घडवला त्यामागे त्यांचीच  प्रेरणा आहे. 

कठीण अशी लढाई लढलो. हितचिंतक आणि राजकारणी लोकांना त्यावेळी धास्ती वाटली. मात्र लढाई साधी नव्हती, पण जिंकलो. दिघेंचं स्वप्न होतं की ठाण्याच्या मुख्यमंत्री होईल आणि ते स्वप्न पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. मला अभिमान आणि समाधान आहे माझ्या गुरूच्या आशीर्वादाने पल्ला गाठला .या सरकारने दीड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही मात्र सरकार लोकांचं आहे, कोणाला ते हजम होत नाही, घशाखाली उतरत नाही.एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील अशी धास्ती अनेकांना होती मात्र आपल्या पोटात आणि ओठात एकच आहे हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला  आमचा अजेंडा काहीच नाही, सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेShiv Senaशिवसेना