शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

ठाणे जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टरवर खरीप हंगामाची लगबग! २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज

By सुरेश लोखंडे | Published: June 10, 2024 4:58 PM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे.

ठाणे : वळवाच्या पावसाने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कहर केलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामास अनुसरून असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये बी-बियाण्याच्या, खताच्या खरेदीस अनुसरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातही या हंगामात सरासरी ६० हजार हेक्टर शेती लागवडीखाली येणार आहे. त्यासाठी तब्बल २२ हजार क्विंटल बियाण्याची गरज लक्षात घेऊन तशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजार हेक्टरवर अधिक लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. गेल्यावर्षी ५३ हजार ७४२ हेक्टरवर भात पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदाच्या या खरीप हंगामास अनुसरून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रुपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी अधिकाऱ्यांनी एकत्र येत घेतलेल्या निर्णयानुसार कृषी विभागाने ११ हजार ११० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी शासनाकडे केली असता जिल्ह्यासाठी दहा हजार मेट्रिक टन खताचा साठा मंजूर केला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीस अनुसरून मंजूर खताच्या साठ्यापैकी सात हजार ९०० मे. टन युरिया खताचा वाटा त्यात आहे. याशिवाय जिल्ह्यांसाठी २२ हजार क्विंटल भात बियाण्यांची गरज आहे. त्यात ४५ टक्के बियाणे बदल गृहित धरून नऊ हजार ९०० क्विंटल भात बियाण्यांची माग जिल्हा परिषदेने शासनाकडे केली आहे. या बियाण्यांपैकी दाेन हजार २०० क्विंटल बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील असून सात हजार ७०० क्विंटल बियाणे खाजगी बियाणे उत्पादक कंपन्याकडून जिल्ह्याला पुरवण्यात येणार आहे. तर उर्वरित १२ हजार १०० क्विंटल भात बियाणे शेतकरी स्वत:कडील वापरणार असल्याच्या माहितीला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दुजाेरा दिला आहे.नियंत्रण कक्ष -खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या पुरवठ्याबाबतच्या अडचणी, बोगस खते, बियाणे विक्री, जादा दराने निविष्ठांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांना ७०३९९४४६८९ या माेबाइल क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येईल.भरारी पथके -कृषी सेवा केंद्रांकडून रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी, बेकायदा विक्री जादा दराने विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहेत. ही भरारी पथके केव्हाही अचानक कृषी केंद्रांना भेट देतील व तपासणी करतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी