शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम, मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 7:41 PM

मुंबईसह ठाण्यात गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत.

ठाणे : ठाण्यात गेले तीन दिवस होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय, ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा उद्विग्न संताप मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. तेव्हा, ठाणेकरांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून यावेळी तरी विचार करून निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

मुंबईसह ठाण्यात गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर तसेच, ठाणे-माजीवडा जंक्शन-घोडबंदर रोड-कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका शुक्रवारी दुपारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघालेल्या जाधव यांनाही बसला. ठाणे मनपा मुख्यालयाजवळून वसईकडे जाण्यासाठी निघालेले जाधव तब्बल अर्धातास व्हिवियाना मॉल जवळच अडकून पडले. या वाहतूक कोंडीचा फटका शहरातील रुग्णवाहिका, शाळेच्या वाहनांना बसत असून तासनतास वाहने कोंडीमध्ये अडकून पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास स्थानापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व्हिस रोडवर देखील वाहतूक कोंडी झाली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर संबधित प्राधिकरणाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या वाहतूक कोंडीचा फटका सकाळ दुपार आणि सायंकाळी कामावर जाणाऱ्या व परतणाऱ्या नागरिकांना बसतो. घोडबंदर परिसरात राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. तसेच, शाळकरी विद्यार्थ्याना आणि रुग्णवाहिकांना देखील तासन तास अडकून पडावे लागत आहे. खड्डे बुजवण्यात तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यात वाहतूक विभाग आणि प्रशासन कमी पडत आहे, असा आरोपही जाधव  यांनी केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे आगमन यंदा उशिरा झाल्याने या कालावधीत उत्तम नियोजन केले गेले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. ठाण्यात कितीतरी आमदार आहेत, त्या आमदारांना मंत्रीपदे दिली तरी सुद्धा समस्या अजून सुटली नाही. सर्वसामान्य नागरीक कर भरतो, त्याचाही विचार केला जात नाही. तेव्हा, मुख्यमंत्रीच काय तर ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी ही समस्या तशीच राहणार आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता यायला हवी. तरच सुधारणा होतील अन्यथा या समस्या कायम राहतील. तेव्हा, यापुढे मतदान करताना विचार करा.. असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेAvinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसे