शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड थकीत तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ई-चलानद्वारे आपल्या वाहनावर दंड तर साचत नाही ना? वाहनाची नोंदणी करताना अनेक वाहनचालकांचा मोबाइल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ई-चलानद्वारे आपल्या वाहनावर दंड तर साचत नाही ना? वाहनाची नोंदणी करताना अनेक वाहनचालकांचा मोबाइल नंबर वेगळा आणि सध्या वापरात असलेला वेगळा, असे झाल्याने त्यांना ई-चलान मिळत नाही. त्यामुळे हा दंड साचत आहे.

शहरातील लाखो वाहनचालकांनी याबाबतची माहिती तातडीने घ्यायला हवी. तसेच आरटीओ दरबारी सध्या जो मोबाइल क्रमांक वापरात असेल तो देऊन स्वतःची माहिती अपडेट करावी, अन्यथा दंडाची रक्कम वाढत जाऊन जेव्हा तो खर्च वारेमाप होईल तो भुर्दंड मात्र वाहनचालकांच्या चुकीमुळे किंबहुना दुर्लक्षामुळे भरावा लागेल, असे सांगून संबंधित यंत्रणेने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

-----------------

ई-चलान मशीनद्वारे केलेल्या केसेस-

२०२०- ४२ हजार ३९

२० ऑगस्ट २०२१ पर्यंत - ३९ हजार ६६५

-------------

दंड वसूल केलेल्या केसेस-

२०२०- १३ हजार ५६१

२० ऑगस्ट २०२१- ८ हजार ४९७

---------------------

वरिष्ठ वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती :

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा ई-चलान मशीन/डिव्हाइसमध्ये नियमांचे उल्लंघन करताना फोटो घेण्यात येतो. तो डिजिटल एव्हिडन्स म्हणून त्या डिव्हाइसमध्ये अपलोड करून संबंधित वाहनांचा नोंदणी क्रमांक नमूद करून दंड आकारला जातो. सदरचा दंड आकारल्याबाबत वाहनचालक/मालक यांचे नोंदणी करतेवेळी नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून अवगत करण्यात येते व सोबतच्या लिंकद्वारे संबंधितास केलेल्या कारवाईची फोटोसह सविस्तर माहिती पाहता येते. यामध्ये ई-चलान क्रमांक, फोटो, दंड आकारल्याचा दिनांक, वेळ व ठिकाण, कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याची माहिती नमूद असते.

-----------------

वाहनधारकाचा मोबाइल नंबर अपडेट नसेल/ वेगळा असेल तर त्यांना संदेश मिळणार नाही.

मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्या जवळपासच्या वाहतूक पोलीस शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे जाऊन अपडेट किंवा बदलता येतो.

--------------------

डोंबिवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील ई-चलानद्वारे आकारलेल्या दंडाची थकबाकी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक विभागाकडून वेळोवेळी असे प्रलंबित दंड वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाते.

------------------

कोट:

ई-चलान ही प्रक्रिया वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी अमलात आणली आहे. एक जागरूक नागरिक म्हणून सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपल्या वाहनांवर आकारलेला दंड प्रत्येकाने वेळीच जवळपासच्या वाहतूक पोलीस अथवा वाहतूक शाखेमध्ये भरणा करावा.

- उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, डोंबिवली