शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

१९ लाखांच्या चरससह त्रिकूट जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: June 26, 2024 20:29 IST

ठाणे खंडणी विराेधी पथकाची कारवाई : पाेलिस काेठडीत रवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या अनिलकुमार प्रजापती (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक किलाे ८९० ग्रॅम वजनाचे १८ लाख ९० हजारांचे चरस हस्तगत केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली.

अमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती भिवंडीतील टेमघर पाइपलाइन रोडलगत येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे विशेष कृती दलाचे सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मालाेजी शिंदे, निरीक्षक वनिता पाटील, सहायक पाेलिस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडणीस, श्रीकृष्ण गाेरे आणि उपनिरीक्षक विजयकुमार राठाेड आदींच्या पथकाने १३ जून राेजी सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून अनिलकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलाे ७२० ग्रॅम वजनाचे एक १७ लाख २० हजारांचे चरस जप्त केले.

याप्रकरणी शांतीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलकुमार याला अर्जुनकुमार प्रजापती (३८) या त्याच्याच चुलत भावाने चरस विक्री केल्याची माहिती तपासात समाेर आली. त्याच आधारे त्याला खंडणी विराेधी पथकाने २० जून राेजी अटक केली. या प्रकरणात अर्जुनकुमार हा मुख्य सूत्रधार असल्याचेही समाेर आले. त्यानेच श्यामबाबू सराेज (५१) यालाही चरस विक्री केली. त्यानंतर त्यालाही नवी मुंबईतून २१ जून राेजी अटक केली. त्याच्या घरातून एक लाख ७० हजारांचे १७० ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले. या तिघांकडून आतापर्यंत १८ लाख ९० हजारांचे चरस जप्त केले आहे. सहायक पाेलिस निरीक्षक तारमळे हे अधिक तपास करीत आहेत.सूत्रधार अर्जुनकुमार विरुद्ध उत्तरप्रदेशात अनेक गुन्हे-चरसची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार अर्जुनकुमार प्रजापती याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात प्रयागराजमधील कैन्ट पाेलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह एनडीपीएस कायद्याखाली पाच गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ