शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

शॉक लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू, अंबरनाथच्या जलशुद्धीकरण केंद्रात टाकी बांधताना दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:51 IST

Ambernath Accident News: अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू असताना शॉक लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

अंबरनाथ - अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू असताना शॉक लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८), राजन मंडल (१९) अशी मृतांची नावे आहेत. काम करताना तेथे साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पंप लावला होता. अचानक हा पंप बंद पडल्याने सहा कामगार पंप सुरू करण्यासाठी गेले. त्यातील तिघांनी पंप उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शॉक लागला. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला. मात्र, दोन कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.

सुरक्षेची साधने दिली नाहीतबारवी नदीतून पाणी उचलून ते पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पुरवठा करण्यासाठी नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची बांधण्याचे काम सुरू आहे. जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूलाच नव्याने केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर ठेकेदाराने दुर्लक्ष केले. काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची साधने न दिल्याने त्यांना जीव गमवावा लागला, अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातambernathअंबरनाथ