शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तिळगूळ २० टक्क्यांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 04:20 IST

तिळाच्या भाववाढीचा फटका : सर्वसामान्यांच्या खिशावर भार

डोंबिवली : मकरसंक्रांत आणि तिळगुळाचे लाडू यांचे नाते घट्ट आहे. नाती जपण्यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊ न गोड गोड बोलण्याची गळ घातली जाते. मात्र, तिळाचा भाव किलोमागे ६० ते ८० रुपयांनी वाढल्याने तिळाचे लाडू २० टक्क्यांनी महागले आहेत. त्यामुळे यंदा गोड बोलण्यासाठी खिशावरील भार सहन करावा लागणार आहे.

किराणा विक्रेते ताराराम चौहान म्हणाले की, तिळाचे लाडू १५ दिवसांपासून बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी तिळाचे लाडू १६० रुपये किलोने मिळत होते. तिळाच्या भाववाढीमुळे हे लाडू २०० रुपये किलोवर पोहचले आहेत. मागच्या वर्षी १२० रुपये किलोने मिळणारा तीळ यंदा १८० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे. गुळाच्या दरात मात्र कोणतीच वाढ झालेली नाही.

तिळाच्या वड्या मागील वर्षी १६० रुपये किलोने विकल्या जात होत्या. त्यातही वाढ होऊन त्याचा दर किलोला २०० रुपये झाला आहे. तसेच तिळाचा हलवाही १०० रुपयांवरून १२० रुपयांवर गेला आहे. डोंबिवलीतील मिठाई विक्रेते श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, तीळ आणि गुळाचे भाव वाढल्याने तिळाचे लाडू महागले आहेत. मागील वर्षी ३०० रुपये किलोने मिळणारे लाडू ३२० रुपये किलोने विकले जात आहेत. खसखस हलवा २०० रुपये, तर तिळाचा हलवा १६० रुपये किलो झाला आहे. दरम्यान, गुळपोळी, पुरणपोळी आदी पदार्थ बनवण्यासाठी पुरेसे कामगार मिळत नाहीत. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे कठीण जाते, असे विक्रेते म्हणाले.गुळपोळीही महागलीमकरसंक्रातीला गरमागरम गुळपोळी आवडीने खाल्ली जाते. गेल्या वर्षी २२ रुपयांना मिळणारी गुळपोळी यंदा २५ रुपयांना मिळत आहे. नोकरदार महिला गुळपोळी घरी करण्यापेक्षा तयार खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे तयार गुळपोळीला अधिक मागणी आहे. हा पदार्थ बनवणाऱ्या महिला कमी असल्याने त्यांना कामाचा जास्त मोबदला द्यावा लागतो. तसेच त्यासाठी लागणाºया साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत, असे विक्रेते सांगतात. 

टॅग्स :thaneठाणे