शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
4
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
5
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
6
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
7
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
8
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
9
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
10
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
11
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
13
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
15
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
16
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
17
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
18
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
19
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
20
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

बाबा सिद्दिकींच्या हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी टोलमाफी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By अजित मांडके | Published: October 14, 2024 3:45 PM

Baba Siddique : कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन सोमवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले.

ठाणे : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी मुंबईच्या सीमेवर हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन सोमवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

टोल माफी आधीच करायला हवी होती. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्याची गरज होती का?, आजच्या घडीला सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही. दर आठवड्याला सरकार तीन हजार कोटी कर्ज काढत असल्याचा दावाही त्यांनी केला. टोल माफी झाली, याचा आम्हाला आनंद आहे. मुळात टोल वसुलीची  मुदत कधीच संपली आहे. मग या टोल वसुलीची मुदत कोणी वाढवली होती. कोण हा खेळ हा करत होते, ते तपासणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. लोरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली गेली आहे का? असा सवाल त्यांना केला असता, या गोष्टीवर न बोलले बरे असे सांगत असे अक्षय शिंदेवर जर तुम्ही गोळी मारू शकतात. तर काही होऊ शकते असेही ते म्हणाले.  

सरकारला वाटत असेल मला काही होणार नाही. म्हणून माझी सुरक्षा कदाचित वाढवली नसेल. असेही त्यांनी सांगितले. मुळात राज्य सरकारचा पोलीसांच्या कामात हस्तक्षेप वाढत आहे. त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलीस खात्यातील चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासाच्या कामाचा दर्जा हा वेगळा होता. या विभागाचा गुन्हेगाराना दरारा होता. पण आता मुंबई क्राईम ब्रँचचा दर्जा खालवला आहे. पोलिसांनी सरकारच्या मनाविरुद्ध काही काम केले तर पोलिसांची बदली होते.  

पोलीस अधिकारी कारवाई करायला गेले की त्यांना वरून फोन येतात. काही ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पोलीस ठाणे चालवतात. मुळात सरकारच सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नसून महाराष्ट्राचा बिहार होतय असा आरोपही त्यांनी केला. अवघ्या दीड ते दोन लाख रुपयासाठी खून होत असतील तर काय बोलायचे. ही परिस्थिती पाहता आता आम्हाला वाटते की सात नंतर घरात कोंडून घ्यावे. केवळ सत्ताधारी यांचे जीव सुरक्षित आहे. मुंबईच्या सीमेवरील टोल माफिच्या निर्णयाने पाच हजार कोटीचा बोझा सरकार वर पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी वीस हजार कोटी रुपये सरकारला जमा करायचे आहे. उद्या आम्ही जरी सत्तेत आलो तरी अशा प्रकारने तिजोरी खाली असेल, असेही ते म्हणाले.  सर्वोच्च न्यायलय आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून खूप अपेक्षा होती. आता न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड