शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 11, 2023 16:33 IST

वर्षभरात आयोजित केलेल्या चार राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण ८६०७४ प्रकरणे निकाली निघाली आहेत.

प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : वर्षभरात आयोजित केलेल्या चार राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले एकूण ८६०७४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २१५७३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली झाली असून १८५१० दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण ४००८३ तडजोड पात्र असलेली प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सामंजस्याने तडजोड करुन निकाली झाली आहेत, अशी माहीती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वरर सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांचे मार्फत ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व अति. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये अमित एम. शेटे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष, ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, ईश्वर सुर्यवंशी यांचे समन्वयाने शनिवार ९ डिसेंबर, रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.

या निकाली प्रकरणांमध्ये न्यायालयांकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण रक्कम रू. १,७०,७८,२७,६५७/- व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रू. २८,६५,७२,५१५/- अशी एकूण रू. १,९९,४४,००,१७२/- एवढया रकमेचा समावेश आहे. मागील लोकअदालतीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दुसऱ्या वेळेस डीआरटी या कर्ज वसुली प्राधिकरणाकडील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३१ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली असुन त्या प्रकरणांचे तडजोड मूल्य रक्कम रू. ४८ कोटी १२ लाख ४५ हजार ५२४/- एवढे आहे. मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण २९४ प्रकरणांत तडजोड होवुन पिडीतांना रक्कम रू. २५,९५,०३,९६०/- भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण 182 प्रकरणांमध्ये तडजोड होवून रू. १५,६७,०४,९६०/- एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आले आहेत. वसई न्यायालयात एका मोटार अपघात दाव्यामध्ये प्रकरणात गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणुन रूपये २ कोटी ०८ लाख ५० हजार मंजूर करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेLokadalatलोकअदालत