शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

लहान मुले, वयोवृद्ध यांना रेल्वेत प्रवेश द्या - रेल्वे प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 1:05 AM

उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत.

पंकज रोडेकरठाणे : उन्हाळी सुटीमध्ये गावी जाणाऱ्यांसोबत बॅगांची संख्या जास्त असल्याने अनेकदा सामानसुमान रेल्वेगाड्यात चढवण्याच्या नादात बऱ्याचदा लहान मुले आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होऊन ते मागे राहण्याचे प्रकार ठाणे स्थानकात घडत आहेत. त्यातून अपघात घडण्याची शक्यता असते. गाडीची चेन खेचल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान नेणाऱ्यांनी लहान मुले व वृद्धांना सर्वप्रथम रेल्वेत प्रवेश करू द्या, असे आवाहन रेल्वे पोलीस व अधिकाऱ्यांनी केले आहे.

सुटीत गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग काही महिने अगोदर करण्यात येते. दीर्घकाळ प्रवासाला जाणारे आपल्यासोबत छोट्या-मोठ्या गरजेच्या वस्तू घेतात म्हणून बॅगांची संख्या वाढते. बाहेरगावच्या गाड्या फलाटावर जेमतेम चार ते पाच मिनिटे थांबतात. वजनदार बॅगा घेऊन डब्यात चढताना बायकांचा गोंधळ उडतो. मुलांचा हात सुटतो. गोंधळात कुणी खालीच राहिल्यास लक्षात येत नाही. बºयाचदा बॅगा चढवण्याच्या नादात लहान मुले-वयोवृद्धांना गर्दीत चढता येत नाही. ते फलाटावरच राहून जातात. असे प्रकार ठाणे रेल्वेस्थानकात पाहण्यास मिळत आहेत. फलाटावर राहिलेले वृद्ध रेल्वेस्टेशन मॅनेजरकडे येतात किंवा फलाटावर एकटी राहिलेली मुले रडतरडत स्टेशनवर आणली जातात. मुलगा किंवा वडील खाली राहिल्यामुळे पुढील कल्याण किंवा कर्जत-कसारा स्थानकांवर बॅगासह उतरून अन्य डब्यात चढलेल्यांना परत माघारी यावे लागते. बाहेरगावी जायच्या नियोजनावर पाणी सोडावे लागते. असा गोंधळ उडालेली मंडळी रेल्वे अधिकाऱ्यांवर राग काढतात. तिकिटांच्या पैशांची भरपाई देण्याची मागणी करतात. त्यामुळे अगोदर मुले व वृद्ध यांना रेल्वेगाडीत प्रवेश करू द्या, असे आवाहन केले आहे.

...आणि मुलगी फलाटावरपवन एक्स्प्रेस रविवारी दुपारी थोडीशी उशिरा आली. या गाडीने प्रवास करणाºया एक कुटुंबासोबत असलेली पाच वर्षांची मुलगी गडबडीत फलाटावरच राहिली. हे लक्षात येताच एकाने चेन खेचून गाडी थांबवली. त्यानंतर, त्या चिमुरडीला घेतल्यानंतर गाडी सोडण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाºयांना मनस्ताप झाला.

आजी-नातू राहिले खालीचशनिवारी ठाण्यातून आजीआजोबा नातवाला घेऊन औरंगाबादला चालले होते. आजोबा गाडीत चढले, तोच गाडी सुटल्याने आजी आणि नातू खाली राहिले. हे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने गार्डला इशारा करून गाडी थांबवली. त्यानुसार, गाडी थांबल्यावर आजी-नातू गाडीत चढले आणि गाडी सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वे