शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
2
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
3
कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
4
कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?
5
IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा
6
"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?
7
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात करा तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट' वापर!
9
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
10
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
11
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
12
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
13
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
14
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
15
३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू
16
Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश
17
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
18
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
19
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
20
"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Published: March 17, 2017 6:07 AM

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून त

आसनगाव : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून तब्बल १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिवांकडे एक निवेदन दिले आहे.२०१०-११ पासून इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. याअंतर्गत दरवर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु . १०००, पाचवी ते सातवीसाठी रु . १५००, तर आठवी ते दहावीसाठी २००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ३ महिने उलटले, तरी ठाणे जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला गेल्या वर्षातील शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३०, शहापूर तालुक्यात ९ हजारांहून अधिक तसेच कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या प्रत्येक तालुक्यातील हजारो आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सरकार आदिवासींसाठी दररोज नवनवीन आश्वासने, योजना जाहीर करते. (वार्ताहर)