शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 12:10 IST

हा मतदारसंघ  जिंकून बालेकिल्ला राखा, मी स्वत: गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

ठाणे :  ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. येथे १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली आहे. त्यामुळे आताची निवडणूक ही करो या मरोची आहे. हा मतदारसंघ  जिंकून बालेकिल्ला राखा, मी स्वत: गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

ठाण्यात शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, ठाण्याची जागा महायुतीच्या सर्वाधिक मताधिक्याने येणाऱ्या जागांच्या यादीत आहे; परंतु त्यामुळे गाफील राहू नका. लोकसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कसे व किती मतदान होते त्यावर तुमचे प्रगतिपुस्तक ठरविले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

फडणवीस यांनी भाषणात उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणतात, ४८ पैकी ४८ जागा जिंकणार. ते ४८ पैकी ४९ जागाही आणू शकतात, अशी खिल्लीही त्यांनी उडविला.

देशाची दिशा कशी असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितले. पुढील १० वर्षांत भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. मोदी नकली सेना म्हणाले, तर उद्धव ठाकरेंना मिरची का झोंबली? तुमको मिरची लगी तो मै क्या करू, असा टोला देखील फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४