शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

निवडणुकीच्या निकालानंतर गुरवांची वाजणार तुतारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:52 IST

ठाण्यात शिवसेनेचा बोलबाला अधिक आहे. पण, निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची तुतारी वाजणार, हे मात्र नक्की सांगू शकत नसल्याचे मत कोपरखैरणे येथील प्रसिद्ध तुतारीवादक लक्ष्मण गुरव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

- जितेंद्र कालेकर ठाणे : ठाण्यात शिवसेनेचा बोलबाला अधिक आहे. पण, निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची तुतारी वाजणार, हे मात्र नक्की सांगू शकत नसल्याचे मत कोपरखैरणे येथील प्रसिद्ध तुतारीवादक लक्ष्मण गुरव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. त्याचवेळी मानखुर्द येथील संदीप गुरव यांनी युतीचे सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. सध्या या दोघांना ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरांत राजकीय मेळावे, सभा, प्रचारफेऱ्यांमध्ये तुतारी वाजवण्याकरिता प्रचंड मागणी आहे.ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार रॅली आणि चौक सभांनी चांगलाच जोर धरला आहे. प्रत्येक पक्षाने बॅनरबाजी करूनही आपला प्रचार सुरू केला आहे. प्रचारसभा, कार्यकर्ते मेळावे अशा ठिकाणी जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांचे आगमन होते, तेव्हा तुतारी वाजवली जाते. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा तत्सम मोठे नेते भाषणाला उभे राहतात, तेव्हा अगोदर तुतारी वाजते व मग शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा होतात. त्यानंतर नेते बोलायला उभे राहतात. या प्रत्येक ठिकाणी तुतारी वाजवण्याकरिता गुरव यांना मोठ्या प्रमाणात आमंत्रणे येऊ लागली आहेत. ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि नवी मुंबईतून लक्ष्मण आणि त्यांचे मोठे भाऊ संदीप गुरव येतात. मूळ सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळा तालुक्यातील असलेली ही भावंडे मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील राजकीय कार्यक्रमांना तसेच लग्नसमारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. बड्या नेत्यांचे किंवा सेलिब्रिटींचे आगमन म्हटले की, मराठमोळ्या तुतारीवादकांना आवर्जून पाचारण केले जाते. गावी अंबाबाईदेवीच्या आरतीच्या आधी आणि नंतर तुतारी वाजवण्याची प्रथा आहे. याच प्रथेमुळे पुढे शहरातही मुख्य राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना तुतारी वाजवणाऱ्यांना मोठी मागणी वाढू लागली. लक्ष्मण गुरव यांच्यासह १० ते १५ जणांच्या ग्रुपला अशा सभांच्या ठिकाणी हमखास बोलवण्यात येते. लक्ष्मण यांचे भाऊ संदीप, भाचा प्रदीप गुरव आणि अन्य काही नातेवाईक विश्वास गुरव तसेच चंद्रकांत गुरव याच व्यवसायात स्थिरावले आहेत. ठाण्यात गुढीपाडव्यापासूनच राजकीय प्रचाराच्या कार्यक्रमांच्या आॅर्डर मिळाल्याचे लक्ष्मण सांगतात. यामध्ये शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस हे पक्ष आघाडीवर आहेत. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन ते राजकीय मेळाव्यातील महत्त्वाचे सत्कार अशा वेळी तुतारी वाजवण्यास सांगितले जाते. शिवसेनेकडूनच मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळाल्याचेही ते म्हणाले. तुतारीवादन आणि फेटे बांधणे, अशी दुहेरी आॅर्डर मिळत असल्यामुळे तीन तासांचे दोन कलाकारांचे तीन हजार रुपये घेतले जातात. राजकीय कार्यक्रम बºयाचदा अगदी चार ते पाच तासांपर्यंतही लांबतात. अशावेळी चार हजार रुपये आकारून दोघांमध्ये प्रत्येकी दोन हजार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.>राजकीय कार्यक्रमांच्या नियोजनाने दमछाकशिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यादिवशीही ४०० फेटे आणि दोन तुतारीवादकांना आॅर्डर दिली होती, असे त्यांनी सांगितले. लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम एकत्र आल्याने आता मागणी पूर्ण करताना आम्हा मंडळींची मोठी कसरत होत आहे, असे ते म्हणाले. राजकीय परिस्थितीबद्दल आपण नेमके सांगू शकत नाही. तरीही सेनेचे वजन वाटते, असे मोकळेपणाने या तुतारीवादकांपैकी एकाने सांगितले. पण, निवडणुकीत तुतारी कोणाची वाजेल, हे सांगणे मात्र कठीण असल्याचे लक्ष्मण गुरव म्हणाले. ठाण्यात सध्या शिवसेनेपाठोपाठ, राष्टÑवादी आणि मनसेचीही तुतारीसाठी आमंत्रणे असतात, असे संदीप यांनी सांगितले. नवी मुंबईत असे कार्यक्रम राबवण्यात राष्टÑवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे ते सांगतात. संदीप ३० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. राजकीय परिस्थितीविषयी ते म्हणाले, भाजपचा सध्या बोलबाला आहे. युतीचे सरकार पुन्हा येण्याची शक्यता वाटते. संदीप यांना मात्र अजून प्रचारसभांचे निमंत्रण आलेले नाही.